महाराष्ट्रामध्ये फीरण्यासाठी चांगली 10 ठिकाण कोणती आहेत?

फिरायला जायचा प्लान करताय तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कमी खर्चात, कमी वेळात आपण महाराष्ट्रातच सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा व सहलीचा आनंद लुटू शकतो.चला तर मग पाहुया महाराष्ट्रातील फिरण्यासाठी चांगली 10 ठीकाने 

1}मुंबई -:

मुंबईमुंबई शहर हे स्वन्नांचे तसेच कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असून ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे विविध खाण्याची दुकाने, अदभूत वास्तुकला आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. सुट्टी घालविण्यासाठी विविध मनोरज ठिकाणांनी भरलेले ठिकाणे आहेत. तसेच प्रसिध्द मंदिर, चर्च, मस्जिद अशा धार्मीक स्थळांना देखील भेट देण्यासारखे सुंदर ठिकाणे आहेत.
1-मुंबई मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन ठिकाण: गेटवे ऑफ इंडिया
2-मुंबई चे समुद्रकिनारे: चौपाटी आणि जुहू बीच
3- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
4-वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय
5-सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर
6-हाजी अली
7-नेहरू तारांगण

2}रायगड-:

रायगडावर फिरण्यासाठी अनेक प्रवेशद्वार, मंदिरे, पाण्याची टाकी, राजवाडे आणि हिरकणी बुरुज
प्रवेशद्वार,महा दरवाजा, पालखी दरवाजा, नगारखाना दरवाजा आणि मेणा दरवाजा
मंदिरे जगदीश्वर मंदिर, सतीची समाधी आणि राणी महालाचे अवशेष,पाण्याच्या टाक्या,गंगा सागर, टकमक, हत्ती तलाव आणि खुबलाधा बुरुज , छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध पुतळा, टकमक टोक डोंगर आणि राणी वसा 

3}महाबळेश्वर-:

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.
महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्थर्स सीट ह्या पॉईंट वरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय.

4}छत्रपती शाहू संग्रहालय-:

कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालय 1877 - 1884 या कालावधीत बांधण्यात आले होते. त्याची रचना ब्रिटिश वास्तुविशारद 'चार्ल्स मांट' यांनी केली होती आणि गुजरात आणि राजस्थानमधील जैन आणि हिंदू प्रभावांचे मिश्रण असलेल्या स्थापत्य शैलीनुसार ते बांधले गेले होते. स्थानिक राजवाडा शैलीचा स्पर्श. सध्याच्या काळात, राजवाड्याचा एक मोठा भाग म्हणजे पहिला मजला आजही कोल्हापूरच्या विद्यमान महाराजांचे निवासस्थान म्हणून वापरला जात आहे आणि दुसरीकडे, तळमजला संग्रहालयात रूपांतरित झाला आहे, जो छत्रपती शाहू महल म्हणून ओळखला जातो.

5}अजंठा-वेरुळ -:

संभाजिनगर जिल्ह्यातील या काही विशेष पर्यटन स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.त्या मध्ये याचां सामावेश झाला आहे म्हणुन हि विशेष ठिकाणं बघण्यासाठी केवळ देशातील नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे गर्दि करतात .

6} पाचगणी-:

पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर आहे. आल्हाददायक हवामान आणि शांत वातावरणामुळे सुंदर जंगलात हरवून जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. छोटय़ा छोटय़ा शेतजमिनी आणि वाडय़ांमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे दृश्य हे या निर्मळ स्थानाचे सर्वात प्रशंसनीय वैशिष्ट्य आहे. पाचगणी तुमची भटकंतीची इच्छा पूर्ण करेल आणि तुम्हाला या हिल स्टेशनच्या प्रेमात पडेल.

7}लोणार सरोवर -:

लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक अतिशय सुंदर आणि रहस्यमय तलाव आहे. लोणार क्रेटर तलावाचा उगम सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर जेव्हा उल्का आदळला तेव्हा झाला असे मानले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचे पाणी खारा आणि क्षारीय आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अशा प्रकारचे एकमेव सरोवर आहे. या चमत्कार आणि वैशिष्ट्यांमुळे लोणार क्रेटर तलाव दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते

8}चिखलदरा-:

चिखलदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्ह
येथे मुख्य ठीकाणे-
पंचबोलचे नाव इको पॉईंट.
देवी पॉईंट
नर्सरी गार्डन
प्रॉस्पेट पॉईंट
बेलाव्हिस्टा पॉईंट
बेलेन्टाईन पॉईंट
भीमकुंड‎

9}नागपुर -:

विदर्भात नागपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळे 
दीक्षाभूमी, उमरेड कर्‍हांडला वन्यजीव अभयारण्य, अंबाझरी तलाव व उद्यान, फुटाळा तलाव, पेंच व्याघ्र प्रकल्प, गोरेवाडा तलाव, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, रामटेक किल्ला, क्रेझी कॅसल एक्वा पार्क, खिंडसी तलाव, रमण सायन्स सेंटर, श्री गणेश मंदिर. , स्वामीनारायण मंदिर, फन एन फूड व्हिलेज आणि बरेच काही.

10}ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प-:

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे. त्याच्या उष्णकटिबंधीय कोरड्या पर्णपाती वन परिसंस्थेमध्ये किमान बंदर आहे 80 वाघ, आणि मोठ्या लँडस्केपमध्ये 200 पेक्षा जास्त वाघ आहेत. ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी वाघांची संख्या म्हणून ओळखली जाते. ताडोबा यासह इतर अनेक मांसाहारी प्रजातींना देखील समर्थन देतो बिबट्या आणि ढोले, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि गौर सर्वात सामान्य शिकार प्रजाती आहे.
ताडोबाच्या इतिहासाबद्दल आणि जैवविविधतेबद्दल अधिक जाणून घ्यायच असेल तर आवश्य भेट दया. 
Share:

स्वामी रामानंद तीर्थ-हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार

स्वामी रामानंद तीर्थ -: हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून केलेल कार्य व मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी थोडक्यात माहिती 

👉 हैदराबाद जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानचे नव्हते.त्यांचे मूळ गाव सिंदगी जि. विजापूर हे होते.

👉 जन्म -:3 ऑक्टोबर 1903

👉आईचे नाव -:लक्ष्मीबाई

👉वडिलाचे नाव-:भगवान 

 त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. ते प्राथमिक  शाळेत  शिक्षक होते

👉 शिक्षण-:स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोर्ट या सरकारी शाळेत झाले.असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. 'पारंगत' ही एम. ए.च्या समकक्ष पदवी त्यांनी  मिळवली होती.1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली.

👉 चळवळीत प्रत्यक्ष सहभाग-:1935 साली हिप्परग्याची शाळा सोडून स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी आंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरूज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून देऊन राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घ्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच व नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे पाच जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निझामाबादच्या तुरुंगात ठेवले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागिरदारी, सरंजामदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कूळ कायदा अंमलात आला, याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.. कम्युनिस्ट पक्षाने सरकार पाडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमीकाव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध केला होता पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.

👉राजकरणातील सहभाग-:1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामीजी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.

👉1967 साली आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओमकारांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी त्यानी चालवला.

👉निधन-:22जानेवारी1972 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हैद्राबाद येथे प्राणज्योत मालवली. हैद्राबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे.




Share:

रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास.Ravrambha nibalkar mahiti


मराठा इतिहासातील प्रतिष्ठित समजल्या रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास यांच्या विषयी थोडक्यात माहिती आपण येथे पाहणार आहोत.

रंभाजी  निंबाळकर कोन होते? 

  फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांचे पुत्र महादजी व महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर.निजामशाही स्थापन करण्यात रंभाजींची मोठी भूमिका होती. त्यामुळे निजामने रंभाजींना 1724 साली  "रावरंभा " ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जावू लागले . रावरंभा या शब्दाचा अर्थ होतो सतत जिंकणारा. रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे.

रंभाजींचा जन्म-:

फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे साक्षात शिवरायांचे जावई. संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली.

रावरंभा इतिहास कथा 

आपल्या इतिहासात जरी हे पान समोर आले नसले तरी देखील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. छत्रपती घराण्याच्या सोबत निंबाळकर घराणे देखील प्रसिद्ध होते. निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत लढाया केल्या आहेत. १७०७ साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादी वर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजाचा सातारा व ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.
           मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या अंतर्गत वादाला कंटाळून हैद्राबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात होते रंभाजी निंबाळकर. हैद्राबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणे. त्यांच्या पराक्रमाने खुश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा भूम बारामती तुळजापूर इथली जहागिरी दिली .

रावरंभा व कमला भवानी मंदिर करमाळा-:

रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक होते. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.रावरंभा घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनौरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो.
असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती. त्यामुळे 96 या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व आहे. मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्रे लावलेली आहेत. 96 खांबी मंदिर, मंदिराच्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांमधील 96 कमानी, शिखरावरील 96 शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 96 हा अंक शहाण्णव कुळी मराठा समाजातील 96 कुळाशी संबंधित असून तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नाते जोडणारा आहे.

रंभाजींचा  मृत्यू-:

अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा (सोलापुर)याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे.त्यांच्या मृत्युची तारीख 17 नोव्हेंबर 1736 म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे.



 


Share:

उज्जैन (महाकाल) दर्शन यात्रा।

उज्जैन फिरा आमच्या सोबत।

उजैन यात्रा  सर्वोत्तम वेळ  कधी-मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान.

उज्जैनच्या सहलीसाठी योग्य कालावधी म्हणजे 2 दिवसांची सहल. तुम्ही शहरातील सर्व ठिकाणे आणि जवळपासच्या पर्यटन स्थळांचाही आनंद घेऊ शकता.

हवाई मार्गे-: उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ  आहे, जे शहरापासून 50 किमी अंतरावर आहे.

 रेल्वे मार्ग -: जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन. 

अंतर -: मुबंई - उज्जैन 640 km (12 तास)

           छ.संभाजीनगर - उजैन 470 km (9तास)

          नागपुर - उजैन 540 (10तास)

उज्जैन मध्ये भेट देण्याची ठिकाणे-:

1. महाकालेश्वर मंदिर

हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाय, हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याची रचना अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने केली गेली आहे.या मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा आहे. उज्जैनमधील नागरिकांना दूषण नावाचा एक राक्षस त्रास देत होता. त्याचा नायनाट करण्यासाठीच शंकर महादेवांनी महाकाल रूप धारण केलं आणि उज्जैनमध्ये प्रकटले. 

2. काल भैरव मंदिर-:

कालभैरव मंदिर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर तंत्र पंथ आणि काळ्या जादूशी देखील संबंधित आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येतात.

3. कालियादेह पॅलेस-:

कालियादेह पॅलेस हा शिप्रा नदीच्या काठावर असलेला एक राजवाडा आहे. हे उज्जैनमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. एकदा सूर्यकुंड-ब्रह्माकुंड नावाच्या दोन टाक्यांसह शिप्रा नदीच्या काठावर सूर्याचे सुंदर मंदिर आहे.

4. जंतरमंतर उज्जैन-:

जंतरमंतर अथवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इ. स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या त्यतीलच हि एक आहे.

राम घाट-:

कुंभमेळ्याचा भाग असलेल्या लाखो लोकांपैकी तुम्ही एक असाल तर तुम्ही राम घाटाला भेट दिलीच पाहिजे. याच ठिकाणी पहाटेच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अनेक आरत्या होतात. नदीच्या पाण्यात सुंदर आरती आणि ज्वालांचे प्रतिबिंब पाहण्यासारखे आहे. 

इतर ठीकाणे-:

हरसिद्धी मंदिर

इस्कॉन मंदिर
 
भर्त्रीहरी लेणी

भारत माता मंदिर

 उजैन विषयी हटके-:राजाचा मुक्काम झाला तर…

फार पूर्वापार काळापासून, एक अशी कथा सांगितली जाते की उज्जैन या शहरात कुणीही राजा वास्तव्य करत नाही. याचं कारण असं, की कुठल्याही राजाने इथे वास्तव्य केलं तर त्याच्यावर आपलं साम्राज्य गमावण्याची पाळी येते.
          असं म्हटलं जातं, की देशाचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं सरकार ज्यादिवशी कोसळलं, त्याच्या आदल्या दिवशी त्यांचं वास्तव्य उज्जैनमध्ये होतं.
       सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

भगवान शंकर यांच्या ‘महाकाली’ रूपाचं दर्शन घ्यायला येताय ना?


Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels