फिरायला जायचा प्लान करताय तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कमी खर्चात, कमी वेळात आपण महाराष्ट्रातच सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा व सहलीचा आनंद लुटू शकतो.चला तर मग पाहुया महाराष्ट्रातील फिरण्यासाठी चांगली 10 ठीकाने
महाराष्ट्रामध्ये फीरण्यासाठी चांगली 10 ठिकाण कोणती आहेत?
1}मुंबई -:
2}रायगड-:
3}महाबळेश्वर-:
4}छत्रपती शाहू संग्रहालय-:
5}अजंठा-वेरुळ -:
10}ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प-:
स्वामी रामानंद तीर्थ-हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार
![]() |
स्वामी रामानंद तीर्थ -: हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून केलेल कार्य व मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी थोडक्यात माहिती
👉 हैदराबाद जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानचे नव्हते.त्यांचे मूळ गाव सिंदगी जि. विजापूर हे होते.
👉 जन्म -:3 ऑक्टोबर 1903
👉आईचे नाव -:लक्ष्मीबाई
👉वडिलाचे नाव-:भगवान
त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते
👉 शिक्षण-:स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोर्ट या सरकारी शाळेत झाले.असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. 'पारंगत' ही एम. ए.च्या समकक्ष पदवी त्यांनी मिळवली होती.1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली.
👉 चळवळीत प्रत्यक्ष सहभाग-:1935 साली हिप्परग्याची शाळा सोडून स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी आंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरूज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून देऊन राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घ्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच व नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे पाच जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निझामाबादच्या तुरुंगात ठेवले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागिरदारी, सरंजामदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कूळ कायदा अंमलात आला, याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.. कम्युनिस्ट पक्षाने सरकार पाडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमीकाव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध केला होता पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.
👉राजकरणातील सहभाग-:1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामीजी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.
👉1967 साली आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओमकारांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी त्यानी चालवला.
👉निधन-:22जानेवारी1972 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हैद्राबाद येथे प्राणज्योत मालवली. हैद्राबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे.
रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास.Ravrambha nibalkar mahiti
मराठा इतिहासातील प्रतिष्ठित समजल्या रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास यांच्या विषयी थोडक्यात माहिती आपण येथे पाहणार आहोत.
रंभाजी निंबाळकर कोन होते?
रंभाजींचा जन्म-:
रावरंभा इतिहास कथा
रावरंभा व कमला भवानी मंदिर करमाळा-:
रंभाजींचा मृत्यू-:
अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा (सोलापुर)याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे.त्यांच्या मृत्युची तारीख 17 नोव्हेंबर 1736 म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे.
उज्जैन (महाकाल) दर्शन यात्रा।
उज्जैन फिरा आमच्या सोबत।
उजैन यात्रा सर्वोत्तम वेळ कधी-मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान.
उज्जैनच्या सहलीसाठी योग्य कालावधी म्हणजे 2 दिवसांची सहल. तुम्ही शहरातील सर्व ठिकाणे आणि जवळपासच्या पर्यटन स्थळांचाही आनंद घेऊ शकता.
हवाई मार्गे-: उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे, जे शहरापासून 50 किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग -: जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन.
अंतर -: मुबंई - उज्जैन 640 km (12 तास)
छ.संभाजीनगर - उजैन 470 km (9तास)
नागपुर - उजैन 540 (10तास)
उज्जैन मध्ये भेट देण्याची ठिकाणे-:
1. महाकालेश्वर मंदिर
हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाय, हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याची रचना अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने केली गेली आहे.या मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा आहे. उज्जैनमधील नागरिकांना दूषण नावाचा एक राक्षस त्रास देत होता. त्याचा नायनाट करण्यासाठीच शंकर महादेवांनी महाकाल रूप धारण केलं आणि उज्जैनमध्ये प्रकटले.
2. काल भैरव मंदिर-:
कालभैरव मंदिर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर तंत्र पंथ आणि काळ्या जादूशी देखील संबंधित आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येतात.
3. कालियादेह पॅलेस-:
4. जंतरमंतर उज्जैन-:
राम घाट-:
कुंभमेळ्याचा भाग असलेल्या लाखो लोकांपैकी तुम्ही एक असाल तर तुम्ही राम घाटाला भेट दिलीच पाहिजे. याच ठिकाणी पहाटेच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अनेक आरत्या होतात. नदीच्या पाण्यात सुंदर आरती आणि ज्वालांचे प्रतिबिंब पाहण्यासारखे आहे.