उज्जैन (महाकाल) दर्शन यात्रा।

उज्जैन फिरा आमच्या सोबत।

उजैन यात्रा  सर्वोत्तम वेळ  कधी-मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान.

उज्जैनच्या सहलीसाठी योग्य कालावधी म्हणजे 2 दिवसांची सहल. तुम्ही शहरातील सर्व ठिकाणे आणि जवळपासच्या पर्यटन स्थळांचाही आनंद घेऊ शकता.

हवाई मार्गे-: उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ  आहे, जे शहरापासून 50 किमी अंतरावर आहे.

 रेल्वे मार्ग -: जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन. 

अंतर -: मुबंई - उज्जैन 640 km (12 तास)

           छ.संभाजीनगर - उजैन 470 km (9तास)

          नागपुर - उजैन 540 (10तास)

उज्जैन मध्ये भेट देण्याची ठिकाणे-:

1. महाकालेश्वर मंदिर

हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाय, हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याची रचना अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने केली गेली आहे.या मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा आहे. उज्जैनमधील नागरिकांना दूषण नावाचा एक राक्षस त्रास देत होता. त्याचा नायनाट करण्यासाठीच शंकर महादेवांनी महाकाल रूप धारण केलं आणि उज्जैनमध्ये प्रकटले. 

2. काल भैरव मंदिर-:

कालभैरव मंदिर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर तंत्र पंथ आणि काळ्या जादूशी देखील संबंधित आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येतात.

3. कालियादेह पॅलेस-:

कालियादेह पॅलेस हा शिप्रा नदीच्या काठावर असलेला एक राजवाडा आहे. हे उज्जैनमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. एकदा सूर्यकुंड-ब्रह्माकुंड नावाच्या दोन टाक्यांसह शिप्रा नदीच्या काठावर सूर्याचे सुंदर मंदिर आहे.

4. जंतरमंतर उज्जैन-:

जंतरमंतर अथवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इ. स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या त्यतीलच हि एक आहे.

राम घाट-:

कुंभमेळ्याचा भाग असलेल्या लाखो लोकांपैकी तुम्ही एक असाल तर तुम्ही राम घाटाला भेट दिलीच पाहिजे. याच ठिकाणी पहाटेच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अनेक आरत्या होतात. नदीच्या पाण्यात सुंदर आरती आणि ज्वालांचे प्रतिबिंब पाहण्यासारखे आहे. 

इतर ठीकाणे-:

हरसिद्धी मंदिर

इस्कॉन मंदिर
 
भर्त्रीहरी लेणी

भारत माता मंदिर

 उजैन विषयी हटके-:राजाचा मुक्काम झाला तर…

फार पूर्वापार काळापासून, एक अशी कथा सांगितली जाते की उज्जैन या शहरात कुणीही राजा वास्तव्य करत नाही. याचं कारण असं, की कुठल्याही राजाने इथे वास्तव्य केलं तर त्याच्यावर आपलं साम्राज्य गमावण्याची पाळी येते.
          असं म्हटलं जातं, की देशाचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं सरकार ज्यादिवशी कोसळलं, त्याच्या आदल्या दिवशी त्यांचं वास्तव्य उज्जैनमध्ये होतं.
       सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

भगवान शंकर यांच्या ‘महाकाली’ रूपाचं दर्शन घ्यायला येताय ना?


Share:

3 comments:

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels