ग्रामपंचायतीची कामे :-
जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या वित्तीय मर्यादेत ग्रामपंचायतीला प्रामुख्याने खालील कार्ये करावी लागतात.
१) आरोग्यविषयक कार्ये :-
👉पिण्याच्या पाण्याची व तसेच जनावरांसाठी पाण्याची सोय करणे.
👉 सार्वजनिक विहीर, रस्ते, गटारी इ. स्वच्छ ठेवणे.त्यांची विल्हेवाट लावणे, जेणेकरून आरोग्य अबाधित राहील..
👉 आरोग्याविषयी उपद्रवी गोष्टी थांबविणे तसेच मेलेली जनावरे गावाबाहेर पाठवून
👉 स्मशानभूमीची योग्य प्रकारे व्यवस्था करणे.
👉 बागा व खेळाच्या मैदानाची व्यवस्था करणे.
👉 सार्वजनिक मुतार्यां बांधणे.
👉 गावातील केरकरचना, अस्वच्छ खड्डे, गटारी व नाल्या इ. साफ करणे.
👉 बाल आरोग्यासंबंधी काळजी घेणे.
२) बांधकामविषयक कार्ये :-
👉 दिवाबत्तीची सोय करणे.
👉सार्बजनिक रस्ते, गटारी, बांध, पूल इ. बांधणे व त्याची दुरुस्ती व देखरेख करणे.
👉 बाजार टांगा व बैलगाडी स्थानकावर नियंत्रण ठेवणे.
👉 खाटीकखान्याचे बांधकाम व देखरेख करणे.
👉 रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावणे आणि त्याच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी करून योग्य प्रकारे जोपासना करणे.
👉 धर्मशाळा, कपडे धुण्याचे घाट, बाजारपट्टी बांधणे इ.
👉 शिक्षणाचा प्रसार करणे.
👉 व्यायामशाळा व करमणुकीची साधणे उपलब्ध करू देणे.
👉कला आणि संस्कृती यांची जोपासना करणे.
👉 सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाची व्यवस्था करणे.
👉 गावातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कल्याणकारी कार्य हाती घेणे.
उदा. गावात नशाबंदीसाठी प्रयत्न करून भ्रष्टाचार नाहीसा करणे. प्रौढ शिक्षणास उत्तेजन देणे. शेतीविषयक शिक्षण व माहिती देणे.
४)संरक्षणविषयक कार्ये :-
👉गावाचे संरक्षण तसेच शेतीतील पिकांचे संरक्षण करणे इ.
👉 व्यापार व धान्यापासून जर नागरिकाच्या जीवनाला धोका होत असेल तर त्यावर कडक नियंत्रण ठेवणे.
👉 आगीपासून नागरिकाच्या जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे इ.
५) प्रशासनासंबंधी कार्ये :-
👉 गावातील वॉर्डाना व घरांना क्रमांक देणे.
👉 शेती व बिनशेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम ठरविणे.
👉 ग्रामीण विकास योजना राबविण्यासाठी आवश्यक त्या पैशाची मागणी करणे.
👉केंद्र व राज्य सरकारने स्वीकृत केलेले पैसे गावाच्या विकासासाठी आणून ते योग्य प्रकारे खर्च करणे.
👉 विकास कार्याचे सर्वेक्षण करणे.
👉 विकास योजना तयार करणे.
👉 गाव मालकीची जमीन, बाजारपेठ, यात्रेकरू इ. वर नियंत्रण ठेवणे.
👉 पंचायतीची सर्व कागदपत्रे तयार करून ठेवणे.
👉 गावातील लोकसंख्येची पर्यायाने जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे.
आणखी वाचा >> FIR व NCR मधील फरक
६) कल्याणकारी कार्ये :-
👉 जमीन सुधारणासंबंधी कार्यात राज्य सरकारच्या अंमलबजावणीत मदत करणे.
👉 अपंग, आजारी किंवा दारिद्री लोकांना मदत करणे.
👉 नैसर्गिक आपत्तीस त्रासलेल्या लोकांना मदत करणे.
👉 पडीत जमीन राज्य सरकारच्या परवानगीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन तिचा शेतीसाठी उपयोग करणे.
👉 गावातील लोकांचे सहकार्य घेऊन श्रमदानाने रस्ते तयार करणे व अशा कार्यातून ग्रामविकासात भर टाकणे.
👉 स्वस्त धान्याची दुकाने उघडणे.
७) शेतीविषयक कार्ये :-
👉 शेती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे व त्यात आदर्श शेती कशी बनविता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधणे.
👉धान्याचे कोठार बांधणे.
👉 शेती उत्पादनात किमान स्तर आणण्यासाठी प्रयत्न करणे.
👉शेतीला आवश्यक अशा नैसर्गिक खताचे रक्षण करणे. कंपोस्ट खते तयार करून त्याची विक्री करणे.
👉 सुधारित बी-बियाणे, कीटकनाशक औषधी आणि शेती उपयोगी शास्त्रीय अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देणे.
👉गायरान व वनांचे संरक्षण करणे.
८) इतर कार्ये : :-
👉 गावातील जनावरांचे रक्षण करणे आणि चांगल्या जनावरांची पैदास करण्यासाठी मदत करणे.
👉गावात लहान लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे.
👉 जमीन महसूल जमा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास मदत करणे व जमिनीचे योग्य रेकॉर्ड ठेवणे.
👉 ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आखलेल्या धोरणानुसार इतर कार्य करणे.
👉 प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली मालमत्ता लिजवर देण्याचा किंवा विकण्याचा अधिकार असतो. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अत्यावश्यक आहे.
वरील विविध स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत करत असते.
आणखी वाचा >> पोलीस पंचनामा म्हणजे काय
अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.