ग्राम पंचायतीची कामे

ग्राम पंचायत हे खरे तर गाव स्तरावर लोकशाही पद्धतीने चालवणारे आणि सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करणारे सर्वात लहान संस्था आहे. गावाचा कारभार सांभाळणारी ही मुख्य संस्था आहे. ग्रामपंचायत माहिती आपण पाहात आहोत.त्याचे सदस्य आणि सरपंच निवडण्यासाठी ग्राम स्तरावर निवडणुका घेतल्या जातात. यामध्ये लोक मतदान करतात आणि पंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्डातुन सदस्य व सरपंच निवडुन येतात. ही निवडणूक 05 वर्षांसाठी असते. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक प्रकारची कामे केली जातात, ज्यामध्ये काही मुख्य कामे आपण ग्रामपंचायतीची कामे 2023 (grampanchyt kame in marathi 2023) येथे पाहणार आहोत. चला तर मग पाहुया.
    




ग्रामपंचायतीची कामे :-


जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या वित्तीय मर्यादेत ग्रामपंचायतीला प्रामुख्याने खालील कार्ये करावी लागतात.


१) आरोग्यविषयक कार्ये :-

 

 👉पिण्याच्या पाण्याची व तसेच जनावरांसाठी पाण्याची सोय करणे.

 👉 सार्वजनिक विहीर, रस्ते, गटारी इ. स्वच्छ ठेवणे.त्यांची विल्हेवाट लावणे, जेणेकरून आरोग्य अबाधित राहील..

👉 आरोग्याविषयी उपद्रवी गोष्टी थांबविणे तसेच मेलेली जनावरे गावाबाहेर पाठवून 

👉 स्मशानभूमीची योग्य प्रकारे व्यवस्था करणे. 

👉 बागा व खेळाच्या मैदानाची व्यवस्था करणे.

👉 सार्वजनिक मुतार्यां बांधणे.

👉 गावातील केरकरचना, अस्वच्छ खड्डे, गटारी व नाल्या इ. साफ करणे.

👉 बाल आरोग्यासंबंधी काळजी घेणे.


२) बांधकामविषयक कार्ये :-


👉 दिवाबत्तीची सोय करणे.

 👉सार्बजनिक रस्ते, गटारी, बांध, पूल इ. बांधणे व त्याची दुरुस्ती व देखरेख करणे. 

👉 बाजार टांगा व बैलगाडी स्थानकावर नियंत्रण ठेवणे.

 👉 खाटीकखान्याचे बांधकाम व देखरेख करणे.

👉 रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावणे आणि त्याच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी करून योग्य  प्रकारे जोपासना करणे.

👉 धर्मशाळा, कपडे धुण्याचे घाट, बाजारपट्टी बांधणे इ.

👉 शिक्षणाचा प्रसार करणे.

👉 व्यायामशाळा व करमणुकीची साधणे उपलब्ध करू देणे. 

 👉कला आणि संस्कृती यांची जोपासना करणे.

👉 सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाची व्यवस्था करणे.

 👉 गावातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कल्याणकारी कार्य हाती घेणे.

 उदा. गावात नशाबंदीसाठी प्रयत्न करून भ्रष्टाचार नाहीसा करणे. प्रौढ शिक्षणास उत्तेजन देणे. शेतीविषयक शिक्षण व माहिती देणे.


४)संरक्षणविषयक कार्ये :-


 👉गावाचे संरक्षण तसेच शेतीतील पिकांचे संरक्षण करणे इ.

👉 व्यापार व धान्यापासून जर नागरिकाच्या जीवनाला धोका होत असेल तर त्यावर कडक नियंत्रण ठेवणे.

👉 आगीपासून नागरिकाच्या जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे इ.


५) प्रशासनासंबंधी कार्ये :-


👉 गावातील वॉर्डाना व घरांना क्रमांक देणे.

👉 शेती व बिनशेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम ठरविणे. 

👉 ग्रामीण विकास योजना राबविण्यासाठी आवश्यक त्या पैशाची मागणी करणे. 

 👉केंद्र व राज्य सरकारने स्वीकृत केलेले पैसे गावाच्या विकासासाठी आणून ते योग्य प्रकारे खर्च करणे.

👉 विकास कार्याचे सर्वेक्षण करणे.

👉 विकास योजना तयार करणे.

👉 गाव मालकीची जमीन, बाजारपेठ, यात्रेकरू इ. वर नियंत्रण ठेवणे. 

👉 पंचायतीची सर्व कागदपत्रे तयार करून ठेवणे.

👉 गावातील लोकसंख्येची पर्यायाने जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे.


 आणखी वाचा >> FIR व NCR मधील फरक


६) कल्याणकारी कार्ये :-


👉 जमीन सुधारणासंबंधी कार्यात राज्य सरकारच्या अंमलबजावणीत मदत करणे. 

👉 अपंग, आजारी किंवा दारिद्री लोकांना मदत करणे.

👉 नैसर्गिक आपत्तीस त्रासलेल्या लोकांना मदत करणे.

👉 पडीत जमीन राज्य सरकारच्या परवानगीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन तिचा शेतीसाठी उपयोग करणे.

👉 गावातील लोकांचे सहकार्य घेऊन श्रमदानाने रस्ते तयार करणे व अशा कार्यातून ग्रामविकासात भर टाकणे.

👉 स्वस्त धान्याची दुकाने उघडणे.


७) शेतीविषयक कार्ये :-


👉 शेती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे व त्यात आदर्श शेती कशी बनविता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधणे. 

 👉धान्याचे कोठार बांधणे.

👉 शेती उत्पादनात किमान स्तर आणण्यासाठी प्रयत्न करणे. 

👉शेतीला  आवश्यक अशा नैसर्गिक खताचे रक्षण करणे. कंपोस्ट खते तयार करून त्याची विक्री करणे.

👉 सुधारित बी-बियाणे, कीटकनाशक औषधी आणि शेती उपयोगी शास्त्रीय अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देणे.

👉गायरान व वनांचे संरक्षण करणे.


८) इतर कार्ये : :-

👉 गावातील जनावरांचे रक्षण करणे आणि चांगल्या जनावरांची पैदास करण्यासाठी मदत करणे.

 👉गावात लहान लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे.

 👉 जमीन महसूल जमा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास मदत करणे व जमिनीचे योग्य रेकॉर्ड ठेवणे.

👉 ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आखलेल्या धोरणानुसार इतर कार्य करणे.

 👉 प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली मालमत्ता लिजवर देण्याचा किंवा विकण्याचा अधिकार असतो. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अत्यावश्यक आहे.

वरील विविध स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत करत असते.


आणखी वाचा >> पोलीस पंचनामा म्हणजे काय 


अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या