Showing posts with label योजना. Show all posts
Showing posts with label योजना. Show all posts

जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)

 जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)





सलोखा योजना मराठी माहिती.सलोखा योजना पात्रता काय आहे.सलोखा योजना अटी व शर्तीं.सलोखा योजना अर्ज प्रक्रिया मराठी माहिती. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 50%पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. करोना सारख्या महामारीत सर्व क्षेत्र बंद असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरुन धरले होते.एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मालकी हक्काचे वाद, शेत बांदाचे वाद, जमिनीचा ताबावाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, हस्तांतरणाचे वाद, भावंडाच्या वाटणीवरुन वाद, शासकीय नियोजनातील चुका यातुन उद्भवलेल वाद यां वादामुळे समाजात वातावरण दुषीत होत आहे. हे  शेताचे वाद अतीशय गुंतागुंतीचे व वेळाखाऊ असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू होतो. आता यातुन सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना नावाने एक योजना 3 जानेवारी 2023 पासून आणली आहे.अशा करुयात की या योजनेच्या नीमीत्ताने का होईना हे वाद संपतील.

सलोखा योजनेची अवश्यकता का आहे-:

पूर्वीच्या जमीनीचे छोटेछोटे सर्वे नंबर होते म्हणजे 1 गुंटे 2 गुंटे असे होते.त्यानंतर आणखी कुटुंब वाडत गेली व जमीनीचे आणखी लहान लहान तुकडे झाले परीणामी शेती मोजनी अडचणीचे झाले हि अडचण लक्षात घेता सरकारने 1947 साली कायदा करुन हे सर्वे नंबर एकत्र करुन काही मानके निश्चित करण्यात आली व गट नंबर देण्यात आले. याचा परीणाम असा झाला की शेती एक झाली परंतु  शेतीच्या ताब्यात घेण्यावरुन गोंधळ निर्माण झाला व शेती एकाच्या नावावर व वहीवाट करणारा दुसरा अशी परस्थिति झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जमीनीची वाटणी करत असताना जमीन नावावर एकाच्या आणी त्याची वहिवाट सोईनुसार दुसर्याकडे देण्यात आली पण नंतर आता पुढच्या पीढीत यावरून वाद निर्माण झाले आहेत. हे वाद सोडवणे आवश्यक होते म्हणून ही योजना आणावी लागली.


सलोखा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -:

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित वाद मिटविण्यासाठी त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल, आणि अर्ज सादर करावा लागेल. या योजने अंतर्गत जमीन एकाकडे व ताबा दुसर्याकडे अशा जमीनीचे व्यवस्थाीकरण करण्यासाठी नाममात्र 1000 रु शुल्क व नोदणी फी 1000 रुपये अकारुन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 

सलोखा योजनेचे निकष व अटी-:


👉🏻 हि योजना फक्त वाद मिटविण्यासाठी आहे इतर व्यापारी उद्देश्यासाठी नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचनामा अर्ज गावच्या तलाट्याकडे करावा लागेल. 

👉🏻तलाट्याला अर्ज प्राप्त झाल्यावर 15 दिवसाच्या आत पंचनामा करवा. 

👉🏻पंचनामा करताना दोन सज्ञान व्यक्तिचा पंचनामा नोंदवहीत नोदवणे गरजेच आहे.

👉🏻सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटातील सगळ्या शेतकऱ्यांची नोंदणीस संमती लागेल. ती नसल्यास अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंद व ताबा यांची अदलाबदल  किमान 12 वर्षांपासून असला पाहिजे.

👉🏻हि योजना पुढच्या 2 वर्षापर्यांत चालु राहील.

👉🏻नोदणी शुल्क अगोदर भराणे गरजेच आहे. 


सलोखा योजनेचे फायदे -:

👉🏻या योजनेचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे नाममात्र 1000 रुपये शुल्का आकारुन जमीनीचे व्यवस्थाीकरण म्हणजे अदल-बदल  करण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा आहे. 

👉🏻नंतर दुसरा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमीनीचे वाद या योजनेने संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

👉🏻खेडे गावात जमीन या मुद्द्यावर खुप वाद होतात ते वाद संपतील व समाजात शांतता रहण्यास मदत होईल.

👉🏻आपली जमीन आपल्या मालकीची आपल्या ताब्यात असेल तर सपाटीकरण व सींचन यासारख्या मूलभूत सुधारना करु शकतो.

👉🏻कर्ज मीळवणे सोपे जाते

👉🏻आपल्या नावावर असणारीच जमीन आपल्या ताब्यात असेल तर भविष्यात निर्माण होणार्यां वाद  अधिच मीटु शकतात.






शेतकरी बांधवांनो शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकार राबवते,पण त्या योजनेचा लाभ हा शेतकरी पात्र असतानाही मीळु शकत नाही.याच कारण म्हणजे शेतकऱ्यांना या योजनाबाबत माहिती नसते. आपन आपल्या marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना या अज्ञाना पासुन दुर करुन ज्या शेतकरी बांधवाना  या योजनेची गरज आहे. त्याना त्या योजनेचा लाभ मीळवुन देण्यासाठी मदत करत आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.

Share:

कीसान क्रेडिट कार्ड(kisan credit card scheme)

काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme) किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc) किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)किसान क्रेडिट कार्ड तक्रारीसाठी हेल्पलाईन नं , किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?




भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान ,पाऊस हे प्रमुख घटक आहेत. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.


काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme)-:


👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते.

👉🏻किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड  द्वारे तयार करण्यात आली.

👉🏻कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली.

👉🏻हे त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करते.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)-:

👉🏻सर्व शेतकरी-व्यक्ती/संयुक्त कर्जदार जे मालक शेती करणारे आहेत .भाडेकरू शेतकरी, तोंडी भाडेपट्टेदार आणि शेअर क्रॉपर्स इ. एसएचजी किंवा शेतकऱ्यांचे संयुक्त उत्तरदायित्व गट ज्यात भाडेकरू शेतकरी, शेअर पीक घेणारे, इत्यादि 

👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारी पात्रता
लाभार्थी शेतकरी असावा त्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे व 70 पेक्षा जास्तहि नसावे. जर कर्जदार हा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल व घ्यायचे असेल तर  60 वर्षापेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.


किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc)-:

👉🏻आधारकार्ड, पैन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट (कोणताही एक)

👉🏻सातबारा उतारा

👉🏻बँक अकाउंट माहिती

👉🏻 मोबाईल नंबर

👉🏻अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

👉🏻वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु वरील काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे

👉🏻किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)-:

👉🏻या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.

👉🏻 सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.

👉🏻शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते...

👉🏻केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येते जे कर्ज फेडण्यासाठी योग्य कालावधी देते.

👉🏻शेतकरी बँकेने त्यांना दिलेली पत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. बँक शाखा व किसन क्रेडिट कार्ड पासबुकवर उपलब्ध पैसे काढण्याच्या स्लिपचा वापर करुन रोख रक्कदिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी  4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज कसा करावा -:


सरकारनं पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे तो डाउनलोड करुन भरुण घ्यावा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत घेऊन जायचा आहे. त्यासोबत सातबारा उतारा आणि 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रं घेऊन जावी लागणार आहेत.एकदा तुम्ही ही कागदपत्रं बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत.

किसान क्रेडिट कार्ड योजना आँनलाईन अर्ज कसा करावा-:

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही सेवा फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.

तक्रारीसाठी हेल्पलाईन( helpline )-:

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात जर शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर ते आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरुनही आपली तक्रार नोंदवू शकता. 

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.
Share:

फक्त १ रुपयात काढा पीक विमा. काय आहे हि योजना?

 फक्त १ रुपयात पीक विमा योजना काय आहे?त्याची नोंदणी कशी करावी? १ रुपयात पीक विमा नोंदणी कोठे करावी? १ रुपयात पीक विमा कश्यासाठी?




शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपयांत पिक विमा (pik vima) काढून मिळेल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. अगोदर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना विमा हप्त्याची 2% रक्कम भरावी लागत होती. आता मात्र शेतकर्‍यांवरचे हे ओझे महाराष्ट्र सरकारने कमी केले आहे कारण आता शेतकर्‍यांकडून फक्त 1 रूपया घेऊन उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा अधिकचा. बोजा पडणार आहे .

👉१ रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी नोंदणी कोठे करावी ?

1 रुपयात पीक विमा याचा लाभ जर घ्यायचा असेल तर अगोदर आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात असूद्या. ही नोंदणी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात   PM किसान योजनेच्या वेबसाइट वर करता येणार आहे. जर घरी बसून ही नोंदणी करता येत नसेल तर आपल्या जवळील “आपले सरकार सेवा केंद्र” सेंटर ला भेट देऊन ही नोंदणी करून घ्या.
 

विमा कवच का?


👉हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर,दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.

👉पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र होतो.

👉स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्रात अतिरिक्त  पाऊस होऊन नुकसान झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. 

👉किड, रोगांमुळे होणारी नुकसान भरपाई मिळावी यासाठी.

निष्कर्ष -:

 हा लेख १ रुपयात पीक विमा योजना संदर्भात आहे , महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे , जर तुम्ही शेतकरी असाल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना पर्यंत जरूर हि माहिती पोहचवा.

Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels