मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.

 मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.



केंद्र सरकार ने पी एम किसान योजनेच्या लाभार्थांला ई-केवासी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुवीधा उपलब्ध करुन दिली आहे.यामुले आता शेतकर्‍यांना स्वताचे किंवा इतरांचे सुध्दा केवासी घर बसल्या करता येणार आहे. चला तर मग ई-केवायसी कशी करावी ते पाहुया.

आणखी वाचा>>शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.

सर्वप्रथम आपल्या मोबाइल मध्ये असलेले जुने पीएम किसान अँप काडुन टाका 

                       👇👇👇

त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टेअर (play store) मध्ये जाऊन  pmkisan GoI हे अँप स्थापित करा (Install) करा.



                           👇👇👇

अँप स्थापित(Install) केल्यावर ते उघडा (ओपन करा) 

                          👇👇👇

त्यानंतर हिंदी किवा इंग्रजी भाषा निवडावी.     

                         👇👇👇

 त्यानंतर New Farmer Registration आणि Login यापैकी 'पीएम किसान' योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. ॲप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक

                          👇👇👇

त्यानंतर Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून 'पीएम' किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी तेथे आपला आधार नंबर टाकावा व GET OTP बटनावर क्लिक करावे. त्यानंतर जनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल तो आलेला चार अंकी OTP टाकावा व Login करावे.

                            👇👇👇

त्या नंतर स्वताचा सहा अंकी MPIN तयार करावा, कारण पुढच्या प्रक्रिया करताना याचा ऊपयोग करुन आपण केवायसी करणे व लाँग इन करणे सोपे होते.

                            👇👇👇

त्यानंतर ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबितटट असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल.

                           👇👇👇

त्यानंतर जर त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबित असेल तर  "click hear to complete your e-kyc" यावर क्लिक करावे.

                          👇👇👇


आणखी वाचा >>किसान क्रेडिट कार्ड योजना 


त्यावर क्लिक केल्यावर थोड्या वेळापुर्वी तयार केलेला सहा अंकी MPIN टाकावा व consent form वर क्लिक करा.

                          👇👇👇

त्यानंतर scan face वर क्लिक करा. नंतर तुम्हाला faceRd app not install on your divice असं येईल नंतर त्याला ok करा.

                          👇👇👇

नंतर प्ले-स्टोअर वर adhar facrRd हे अँप स्थापित  (Install) करुन ते ओपन करा. 

                         👇👇👇

ते अँप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर computing face सुरु होईल नंतर समोर येणाऱ्या सुचनांचे पालन करुन procedd वर क्लिक करा. व मोबाईल चेहरा निट दिसेल अशा प्रकारे धरुन scan face करा. नंतर चेहरा स्कँन झाल्यावर image capture successful असं दिसेल.व आपल्या मोबाईलवर sucessful e-kyc अहा संदेश दिसेल. म्हणजेच तुमची e-kyc झाली.

                       👇👇👇

नंतर जर आपल्याला इतर कोनाची e-kyc करायची असेल तर e-kyc for other beneficiaries वर जाऊन वरी सांगितल्या प्रकारे करु शकता.

आणखी  वाचा >>1 रुपयात पिक विमा

आणखी वाचा >>बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

कीसान क्रेडिट कार्ड(kisan credit card scheme)

काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme) किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc) किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)किसान क्रेडिट कार्ड तक्रारीसाठी हेल्पलाईन नं , किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?




भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान ,पाऊस हे प्रमुख घटक आहेत. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.


काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme)-:


👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते.

👉🏻किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड  द्वारे तयार करण्यात आली.

👉🏻कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली.

👉🏻हे त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करते.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)-:

👉🏻सर्व शेतकरी-व्यक्ती/संयुक्त कर्जदार जे मालक शेती करणारे आहेत .भाडेकरू शेतकरी, तोंडी भाडेपट्टेदार आणि शेअर क्रॉपर्स इ. एसएचजी किंवा शेतकऱ्यांचे संयुक्त उत्तरदायित्व गट ज्यात भाडेकरू शेतकरी, शेअर पीक घेणारे, इत्यादि 

👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारी पात्रता
लाभार्थी शेतकरी असावा त्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे व 70 पेक्षा जास्तहि नसावे. जर कर्जदार हा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल व घ्यायचे असेल तर  60 वर्षापेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.


किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc)-:

👉🏻आधारकार्ड, पैन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट (कोणताही एक)

👉🏻सातबारा उतारा

👉🏻बँक अकाउंट माहिती

👉🏻 मोबाईल नंबर

👉🏻अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

👉🏻वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु वरील काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे

👉🏻किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)-:

👉🏻या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.

👉🏻 सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.

👉🏻शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते...

👉🏻केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येते जे कर्ज फेडण्यासाठी योग्य कालावधी देते.

👉🏻शेतकरी बँकेने त्यांना दिलेली पत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. बँक शाखा व किसन क्रेडिट कार्ड पासबुकवर उपलब्ध पैसे काढण्याच्या स्लिपचा वापर करुन रोख रक्कदिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी  4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज कसा करावा -:


सरकारनं पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे तो डाउनलोड करुन भरुण घ्यावा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत घेऊन जायचा आहे. त्यासोबत सातबारा उतारा आणि 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रं घेऊन जावी लागणार आहेत.एकदा तुम्ही ही कागदपत्रं बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत.

किसान क्रेडिट कार्ड योजना आँनलाईन अर्ज कसा करावा-:

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही सेवा फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.

तक्रारीसाठी हेल्पलाईन( helpline )-:

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात जर शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर ते आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरुनही आपली तक्रार नोंदवू शकता. 

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.
Share:

पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात व आपण पशु-पश्यांच्या संकेतावरुन पावसाचा अंदाज कसा बांधु शकतो.

    पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात व आपण पशु-पश्यांच्या संकेतावरुन पावसाचा अंदाज कसा बांधु शकतो.


      मानवाने कीतीही प्रगती केली असली  तरी देखील मानवाला निसर्गावरच अवलंबुन राहाव लागत आहे. आपण कीतीही निसर्गाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तरी नीट बांधता येत नाही. आता पावसाचच बघाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या बारीक निरीक्षणावरुन हे संकेत लक्षात येतात. आपणही जर पशु-पक्षी यांच्या हालचाली निट बघितल्या तर आपणही बरोबर अंदाज बांधु शकतो.चला तर मग बघुया की पशु-पक्षी आपल्याला कसे संकेत देतात ज्यावरुन आपणही पावसाचा अंदाज अगदी सहज लाऊ शकतो.

👉🏻चातक पक्षी-:

मृगनक्षत्र वेळेवर असल्याचे संकेत व पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात.पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ समजावी.

👉🏻तित्तर पक्षी-:

 हा पक्ष्यांचे थवे 'कोडय़ान केको.. कोडय़ान केको..' अशा स्वरात ओरडू लागले की, लवकरच पाऊस येणार असे समजावे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की, पावसाचे लक्षण समजले जाते.

👉🏻पावशा पक्षी-:

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! 'पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

👉🏻वादली पक्षी-:

 कोळ्यांना वादळवाऱ्याचा संकेत देणारा वादळी पक्षी
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार, याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मासेमार त्यांच्या बोटी समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळ वारा त्याच्या पाठोपाठ येत आहे, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.

👉🏻कावळा-:

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो हा जंगलातला अनुभव आहे. या व्कायतीरीक्त कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणाची ती नांदी असते. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे संकेत मिळू शकतात.यापुढे अजुन नोदवण्यासारखी बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस पडतो. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर दुष्काळाचे आगमन ठरते.

👉🏻चिमण्या-:

चिमण्याणी जर धुळीत लोळण्याचा खेळ सुरू केला तर समजावे लवकरच पाऊसाची शक्यता आहे.

👉🏻मोर-:

पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याच या देखण्या नाचावर लांडोर भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. हा पावसाचा पूर्वसंकेत आहे.

👉🏻टिटवी-:

टिटवी पक्ष्यांनी यावर्षी एकाच विणीच्या हंगामात दोनदा पिल्लं दिलीत.तर समजुन जा पाऊस लांबणार आहे.

जशा प्रकारे पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच काही प्राणीही संकेत देतात .

👉🏻वाघ-: 

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही वाघीन आपल्या पिल्लांना जन्म देत नाही. एवढच नाही तर पावसाची पूर्वकल्पना आल्यावर वाघीनी डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतात. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. कारण यंदा पाऊस नाही, त्यामुळे जंगलात गवत नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी पिल्ल उपाशी मरण्याची शक्यता तयार होते.

👉🏻 हरीण-: 

हरीण आणि वाघ जरी एकमेकांचे शत्रु असले तरी पावसाचा संकेत मात्र एकच देतात.जर पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणीही पिल्लांना जन्म देत नाहीत.

👉🏻मासे-:

डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा व उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार याची अंदाजे चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

👉🏻खेकडे-:

शेतकऱ्याला समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून पावसाचे संकेत मिळत असतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा काळ असतो.

👉🏻मगर-: 

 मगरीने जलाशयाच्या  बाजूच्या मातीत वा वाळूत अंडी घातल्यापासून बरोबर एकशेवीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो. अंड्यात पिलांची बिळांमध्ये वाढ होऊन मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धो धो वाहणाऱ्या पाण्याबरोबर  जवळच्या जलाशयात पोहोचतात.

👉🏻वाळवी/उधई-:

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवीला/उधई ला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते.


👉🏻 मुंग्या-:

जेव्हा काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेत असतील तर पाऊस नक्की पडतो असे समजा.


👉🏻बिळांमध्ये राहणारे प्राणी -:

 बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले तर हमखास पाऊस येतो. कारण या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते.

ज्याप्रकारे पशु-पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच निसर्गातील काही झाडे झुडपेही काही संकेत देतात

👉🏻 मोरंबा किंवा बिब्याच झाड-:

मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाराह हा वृक्ष म्हणजे  गोडंबा, त्यालाच कहि ठीकाणी बिब्याच  झाड म्हणतात जर या झाडाला बहर येला म्हणजे हे दुष्काळाचे संकेत मानला जातो.याबरोबरच खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो.

👉🏻चिंच-:

चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुले आणि कोवळी फळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असाते.

 👉🏻आंबा-:

ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतो त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

👉🏻 मारुती चितमपल्ली यांच्या चार-पाच दशकांच्या जंगलाच्या प्रगाढ अभ्यासाप्रमाणे हरितपर्णी वृक्षांची वनं आणि शुष्कपर्णी पानगळीची जंगलं वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात.
 
👉🏻 ही माहिती आवडली असल्यास  इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर  महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

 बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? बियाने खरेदी करताना फसवल्यास काय करावे ?बियाने उगवलेच नाही तर काय करु ? 



पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते.  त्यामुळे मशागतीची कामे उरकून बियाणे  व खत खरेदीसाठी शेतकरी लगबग करत आहेत.  मात्र ही बियाने खरेदी करताना शेतकरी अनेकदा फसवला जातो मात्र हि फसवणूक आपणाला सहज टाळता येवू शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. चला तर मग आता आपण या लेखात बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी या विषयी माहिती पाहूया.


बियाने खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या-:

👉🏻सर्वात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. 


👉🏻जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे त्यावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाणे उत्पादकाचे नाव, लॉट क्रमांक,व  विक्री किंमत असल्खायाची खात्री करून घ्यावी .  दिलेल्या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची सही किंवा अंगठा असला पाहिजे. 


👉🏻दुकानदाराकडुन पक्क्या बिलाचा आग्रह धरावा व बिल  व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻खरेदी केलेल्या बियाण्याची  पाकिटे सीलबंद आहेत किंवा नाही यांची खात्री करावी


👉🏻बियाणे खरेदी करण्याआधी पाकीटावरील अंतिम मुदत पाहणे जरुरीचे आहे.


👉🏻बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. 


👉🏻पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.


👉🏻बियाणाची पिशवी तिन्ही बाजूंनी शिवलेली असावी. वरील बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते.  पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरणचा टॅग व्यवस्थित राहतील. लेबल आणि टॅग व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻मुदतबाह्य झालेले व पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.


बियाणं विषयी काही तक्रार असेल तर काय करावे-:

बियाणं विषयी काही तक्रार असेल तर बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आसतात. तसेच प्रमाणा पेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती याच्याकडे नमुन्याची तपासणीसाठी  तक्रार अर्ज  स्वरूपात द्यावी. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची zerox जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.


👉🏻शेतकर्‍यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत कलेली असते.



वरील दिल्या गेलेल्या गोष्टींचे आपण तंतोतंत पालन केले तर  होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतो. आणि  भविष्यात होणार आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो .

Share:

दहावीचा निकाल आज........

 


⭕️♦️⚠️दहावीचा निकाल आज...


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज(२ जून ) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल व त्याची मुद्रित प्रतहि घेता येईल.

⚠️पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून नोंदणी.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

कीती विद्यार्थी आहेत-:

२ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दहावीची परीक्षा ५ हजार ३३ केंद्रांवर घेण्यात आली होती. यार्षी परीक्षेला राज्यभरातून एकुन१५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी काय करावे-:


निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.



Share:

फक्त १ रुपयात काढा पीक विमा. काय आहे हि योजना?

 फक्त १ रुपयात पीक विमा योजना काय आहे?त्याची नोंदणी कशी करावी? १ रुपयात पीक विमा नोंदणी कोठे करावी? १ रुपयात पीक विमा कश्यासाठी?




शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपयांत पिक विमा (pik vima) काढून मिळेल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. अगोदर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना विमा हप्त्याची 2% रक्कम भरावी लागत होती. आता मात्र शेतकर्‍यांवरचे हे ओझे महाराष्ट्र सरकारने कमी केले आहे कारण आता शेतकर्‍यांकडून फक्त 1 रूपया घेऊन उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा अधिकचा. बोजा पडणार आहे .

👉१ रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी नोंदणी कोठे करावी ?

1 रुपयात पीक विमा याचा लाभ जर घ्यायचा असेल तर अगोदर आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात असूद्या. ही नोंदणी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात   PM किसान योजनेच्या वेबसाइट वर करता येणार आहे. जर घरी बसून ही नोंदणी करता येत नसेल तर आपल्या जवळील “आपले सरकार सेवा केंद्र” सेंटर ला भेट देऊन ही नोंदणी करून घ्या.
 

विमा कवच का?


👉हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर,दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.

👉पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र होतो.

👉स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्रात अतिरिक्त  पाऊस होऊन नुकसान झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. 

👉किड, रोगांमुळे होणारी नुकसान भरपाई मिळावी यासाठी.

निष्कर्ष -:

 हा लेख १ रुपयात पीक विमा योजना संदर्भात आहे , महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे , जर तुम्ही शेतकरी असाल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना पर्यंत जरूर हि माहिती पोहचवा.

Share:

भोगवटदार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची?करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.

 भोगवटादार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची वर्ग 1 मध्ये कशी आणायची? करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.



भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार असतो. त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा आणि ती जमिन बक्षीसपात्र म्हणुन देण्याचे पूर्ण अधिकार बहाल केलेल असतात. अशा जमीनींचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री व हस्तांतरणासाठी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते . ही मालकीची वडलोपार्जीत आलेली जमीन  असते.

भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार तर असतो. पण त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार नसतं त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतनाच्या जमीन, वनजमीन, गायरान, पुनपुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. 

👉भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनातर्फे शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी या जमिनीबाबत व्यवहाराचे अधिकार नसतात. म्हणजेच या जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी जर भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत कशी करावी?

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या भावाच्या आर्धी (50%)  रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.(अर्थीत शासनकडुन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येते.)  वर्ग 2 ची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन(प्रत्यक्ष) पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो .तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळते.

भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-


👉जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज.

👉 जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा.

👉विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.

👉7/12 व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी.

👉आकरबंदाची मूळ प्रत.

👉एकत्रीकरनाचा मूळ उतारा.

👉मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत
कबुलायत.

👉तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा.

#भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधील सवलतीला 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.


👉 तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास  इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर  महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व  आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.




Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels