‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय?

 ‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय व कसे बनवावे ?‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्डचे फायदे ,‌‌‌‌‌ मनरेगा जाँब कार्डसाठी कागदपत्रे व प्रोसेस काय असते . 





जाँब कार्डची गरज काय-:

जॉब कार्ड जॉब कार्ड ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जारी केले जाते. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत बनवलेले एक कार्ड आहे.ज्याद्वारे ते प्रत्येक वर्षात कोणतेही अकुशल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायद्यानुसार 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा मागण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.या जॉब कार्डने लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी दीली आहे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील या कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉब कार्डमध्ये नोंदवली जाते. यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जॉब कार्ड दिले जातात.

जाँब कार्डमध्ये काय असते-:

या कार्डमध्ये खालील माहिती असते

👉 जाँब कार्ड क्रमांक.

👉उमेदवाराचे नाव. 

👉वडील किंवा पतीचे नाव. 

👉पंचायत व जिल्ह्याचे नाव.

👉ग्रामसभेचे नाव.

👉वय.

👉लींग.


जाँब कार्ड कसे बनवावे -:

जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जावे लागेल. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा. त्याला भरून ते सांगतील ते आवश्यक कागदपत्रे जोडुन त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापरुन तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

मनरेगा जाँब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-:

 👉उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र.

👉 अर्जाचा नमुना.

 👉पासपोर्ट आकाराचे फोटो.

 👉पत्त्याचा पुरावा.

 👉रेशन कार्ड.

 👉आधार कार्ड.

👉पासबुक.

 👉मोबाईल नंबर.

जॉब कार्डवर ऑनलाइन नाव कसे पहावे-:

सर्वप्रथम जॉब कार्डच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in  वर जा. येथे दिलेल्या लिंकद्वारे थेट वेबसाइटवर जाण्यास येथे क्लिक करा.

                        👇

जॉब कार्ड वेबसाइट उघडल्यानंतर, ग्रामपंचायत अंतर्गत अहवाल तयार करा – जॉब कार्ड पर्याय निवडा.

                           👇

आता सर्व राज्यांची यादी उघडेल. त्यात तुमच्या राज्याचे नाव शोधा आणि ते निवडा.

                            👇

यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. यामध्ये प्रथम आर्थिक वर्ष निवडा. यानंतर तुमच्या जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.

                             👇

आता जॉब कार्डशी संबंधित माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. जॉब कार्डमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी R1 बॉक्समधील JobCard/Employment Register पर्याय निवडा.

यानंतर, तुम्ही निवडलेल्या ग्रामपंचायतीची जॉबकार्ड यादी उघडेल. तुम्ही जॉब कार्डमध्ये तुमचे नाव येथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही आँनलाईन नआव व इतर तपशील संकेतस्थळावर पाहु शकत.


आणखी वाचा >> 1 रुपयांत काढा पिक विमा.


मनरेगा जाँब कार्डचे फायदे-:

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, लाभार्थ्याला 100 दिवसांचा रोजगार मिळतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नरेगा जॉब कार्ड दिले जाईल.

 👉या योजनेंतर्गत लोकांना त्यांच्याच क्षेत्रात काम मिळते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही.

👉या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजगार मिळु शकेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

 👉जॉब कार्डमध्ये अर्जदार आपले नाव आणि जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातही लाभ दिला जातो.

👉 जॉब कार्डद्वारे भारतातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

👉नरेगा जॉब कार्डमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 देशातील सर्व राज्यातील गरीब लोक जॉब कार्डचा लाभ घेऊ शकतात.

 👉नरेगा जॉब कार्डची सुविधा ऑनलाइन असल्याने अर्जदाराचा वेळही वाचतो.

👉जॉब कार्डमध्ये तुम्हाला मनरेगा योजनेद्वारे मिळणार्‍या कामाची सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.

👉अर्ज केल्याच्या १५ दिवसांत काम न मिळाल्यास नियमितपणे बेरोजगार भत्ता दिला जाईल.

 👉योजनेंतर्गत नोकरीसाठी केवळ प्रौढ सदस्य पात्र आहेत.

👉 प्रत्येक प्रकल्पात किमान एक तृतीयांश महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.

 👉कामाचे ठिकाण ५ कि.मीच्या असते बाहेर असल्यास, कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता दिला जातो.

 👉महिला आणि वृद्धांना त्यांच्या परिसरात काम करण्यास प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा >> जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना 


मनरेगा योजनेंतर्गत सर्व कामगारांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामगारांसाठी अधिकृत मोबाइल अप्लिकेशन सुरू केले आहे. ज्यातून तुम्ही घरबसल्या नरेगाशी संबंधित माहिती मिळवू शकता. अँप डाउनलोड करण्यासाठी 👇👇

                येथे क्लिक करा.





हे अँप डाउनलोड करून‌ तुम्ही सर्व माहिती मोबाइल मध्ये बघु शकता. 


ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

 आणखी वाचा >> भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग 1मध्ये  कशी आणायची 


आणखी वाचा >>  लंपी विषाणू मराठी माहिती.

Share:

लंपी विषाणू लागण,कारणे,प्रादुर्भाव,उगम,प्रसार मराठी माहिती.

काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात  प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती. 




 नुकताच कोरोना वायरस नंतर गुरांमध्ये लंपी या रोगान थैमान घातले होते. लंपी  हा त्वचाचा रोग आहे असुन यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो. हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा या रोगचे प्रमाण अधिक असते.

काय आहे लंपी विषाणू-:

👉 रोगाला कारणीभूत विषाणू -: Lumpy Skin Disease Virus (LSDV)

👉 विषाणूची प्रजाती (Genus) - Capripoxvirus

👉लंपी विषाणूचे कुल (Family) - Poxviridae ( देवी आणि मंकीपॉक्स विषाणू याच कुळातील आहेत.)

👉 हा Zoonotic विषाणू नाही. याचा अर्थ हा रोग मानवांमध्ये पसरू शकत नाही. हा एक संसर्गजन्य रोग आहे. डास, चावणाऱ्या माश्या आणि गोचिड यांसारख्या वाहकांद्वारे पसरतो. सहसा गायी आणि म्हशींसारख्या प्राण्यांना प्रभावित करतो.

👉हा रोग वाहकांच्या थेट संपर्काद्वारे किंवा दूषित चारा आणि पाण्याद्वारे पसरतो. तसेच कृत्रिम गर्भाधान (बीजारोपण) करताना प्राण्यांच्या वीर्याद्वारे पसरू शकतो.

👉 झालेल्या प्राण्याच्या 'Lymph Nodes' वर (लसिकांवर) परिणाम होतो, ज्यामुळे नोड्स वाढतात आणि त्वचेवर गुठळ्यांसारखे दिसतात. त्यामुळे या रोगास लम्पी असे नाव पडले.

लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात प्रसार -:


👉हा रोग पहिल्यांदा झांबियामध्ये १९२९ मध्ये दिसून आला.

👉नंतर बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. 

👉 त्यानंतर पश्चिम आशिया, आग्नेय युरोप आणि मध्य आशिया आणि अलीकडेच २०१९ मध्ये दक्षिण आशिया आणि चीनमध्ये पसरला.

👉FAO नुसार हा रोग सध्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, पश्चिम आशियाचा काही भाग (इराक, सौदी अरेबिया, सीरियन अरब प्रजासत्ताक) आणि तुर्कीमध्ये प्रदेशनिष्ठ रोग आहे.

👉दक्षिण आशियामध्ये प्रथम जुलै २०१९ मध्ये बांग्लादेशात पसरला. 

👉 ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात पोहोचला. सुरुवातीची प्रकरणे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आली. भारतात अलीकडील प्रसार जास्त प्रसार सुरू झाला आहे.


लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव-:


👉हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो.

👉 विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा रोगबाधेचे प्रमाण अधिक असते .

👉 सर्व वयोगटातील (नर व मादी) जनावरात आढळतो. लहान वासरात तुलनेत प्रमाण अधिक असते.

👉 उष्ण व दमट हवामान रोगप्रसारास पोषक ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास , गोचीड, चिलटे  यांच्यामार्फत होतो.

👉 आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काहीवेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.

👉 त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते.

👉गाई गाबन असल्यास गर्भपात होऊ शकतो.

लंपी रोगाची लक्षणे-:

 👉जर एखाद्या प्राण्याला या लंपी विषाणूची लागण झाली तर सर्वप्रथम त्या ताप येऊ लागतो आणि ते जनावर सुस्त होऊ लागते.

 👉जर एखाद जनावर या विषाणूच्या पकडीत आली तर त्याच्या डोळ्यातून आणि नाकातून स्राव होतो आणि तोंडातून लाळ टपकू लागते.

 👉जेव्हा गाईला हा आजार होतो तेव्हा त्या गायीची दूध देण्याची क्षमता कमी होते.

👉 जेव्हा एखादी गाय या विषाणूच्या कचाट्यात येते तेव्हा त्या गायीच्या अंगावर फोड येऊ लागतात आणि त्या युक्तीमुळे त्या गायीला खूप त्रास होऊ लागतो.

 👉सतत ताप.

 👉वजन कमी होणे.

 👉लाळ येणे.

👉वाहणारे नाक आणि डोळे

👉दुधाची कमतरता जाणवणे.

 👉वेगवेगळ्या प्रकारचे फोड्या दिसणे.

 👉अंगावर पुरळ सारखे गुठळ्या.

लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय -:

👉जर एखाद्या जनावरात हा विषाणू आढळला तर त्याला बाकीच्या जनावरापासून वेगळ ठेवा जेणेकरून ती इतर प्राण्यांमध्ये पसरू नये.

 👉कारण हा रोग माश्या, डास आणि कुंड्यांमुळे देखील पसरतो, म्हणून आपल्या प्राण्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवा जेणेकरून या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला येऊ नयेत.

 👉ज्या वस्तूंमध्ये प्राणी अन्न खातात किंवा पाणी पितात त्या गोष्टी पूर्णपणे स्वच्छ ठेवाव्यात.

 👉तुमच्या जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉 जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉तुमच्या आजूबाजूला संसर्गग्रस्त भाग असल्यास त्या भागातून जनावरांची ये-जा थांबवा.

 👉संसर्ग झालेल्या प्राण्याभोवती जंतू मारणाऱ्या रसायनाची फवारणी करा.

 👉लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जनावराचा नमुना घेत असताना त्या वेळी तुम्हालाहि काळजी घ्यावी लागेल

लम्पी त्वचा रोगावर कोणतीही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते.म्हणुन होण्यापूर्वीच सावधान‌ राहणे गरजेच आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.







Share:

जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)

 जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)





सलोखा योजना मराठी माहिती.सलोखा योजना पात्रता काय आहे.सलोखा योजना अटी व शर्तीं.सलोखा योजना अर्ज प्रक्रिया मराठी माहिती. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 50%पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. करोना सारख्या महामारीत सर्व क्षेत्र बंद असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरुन धरले होते.एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मालकी हक्काचे वाद, शेत बांदाचे वाद, जमिनीचा ताबावाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, हस्तांतरणाचे वाद, भावंडाच्या वाटणीवरुन वाद, शासकीय नियोजनातील चुका यातुन उद्भवलेल वाद यां वादामुळे समाजात वातावरण दुषीत होत आहे. हे  शेताचे वाद अतीशय गुंतागुंतीचे व वेळाखाऊ असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू होतो. आता यातुन सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना नावाने एक योजना 3 जानेवारी 2023 पासून आणली आहे.अशा करुयात की या योजनेच्या नीमीत्ताने का होईना हे वाद संपतील.

सलोखा योजनेची अवश्यकता का आहे-:

पूर्वीच्या जमीनीचे छोटेछोटे सर्वे नंबर होते म्हणजे 1 गुंटे 2 गुंटे असे होते.त्यानंतर आणखी कुटुंब वाडत गेली व जमीनीचे आणखी लहान लहान तुकडे झाले परीणामी शेती मोजनी अडचणीचे झाले हि अडचण लक्षात घेता सरकारने 1947 साली कायदा करुन हे सर्वे नंबर एकत्र करुन काही मानके निश्चित करण्यात आली व गट नंबर देण्यात आले. याचा परीणाम असा झाला की शेती एक झाली परंतु  शेतीच्या ताब्यात घेण्यावरुन गोंधळ निर्माण झाला व शेती एकाच्या नावावर व वहीवाट करणारा दुसरा अशी परस्थिति झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जमीनीची वाटणी करत असताना जमीन नावावर एकाच्या आणी त्याची वहिवाट सोईनुसार दुसर्याकडे देण्यात आली पण नंतर आता पुढच्या पीढीत यावरून वाद निर्माण झाले आहेत. हे वाद सोडवणे आवश्यक होते म्हणून ही योजना आणावी लागली.


सलोखा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -:

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित वाद मिटविण्यासाठी त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल, आणि अर्ज सादर करावा लागेल. या योजने अंतर्गत जमीन एकाकडे व ताबा दुसर्याकडे अशा जमीनीचे व्यवस्थाीकरण करण्यासाठी नाममात्र 1000 रु शुल्क व नोदणी फी 1000 रुपये अकारुन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 

सलोखा योजनेचे निकष व अटी-:


👉🏻 हि योजना फक्त वाद मिटविण्यासाठी आहे इतर व्यापारी उद्देश्यासाठी नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचनामा अर्ज गावच्या तलाट्याकडे करावा लागेल. 

👉🏻तलाट्याला अर्ज प्राप्त झाल्यावर 15 दिवसाच्या आत पंचनामा करवा. 

👉🏻पंचनामा करताना दोन सज्ञान व्यक्तिचा पंचनामा नोंदवहीत नोदवणे गरजेच आहे.

👉🏻सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटातील सगळ्या शेतकऱ्यांची नोंदणीस संमती लागेल. ती नसल्यास अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंद व ताबा यांची अदलाबदल  किमान 12 वर्षांपासून असला पाहिजे.

👉🏻हि योजना पुढच्या 2 वर्षापर्यांत चालु राहील.

👉🏻नोदणी शुल्क अगोदर भराणे गरजेच आहे. 


सलोखा योजनेचे फायदे -:

👉🏻या योजनेचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे नाममात्र 1000 रुपये शुल्का आकारुन जमीनीचे व्यवस्थाीकरण म्हणजे अदल-बदल  करण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा आहे. 

👉🏻नंतर दुसरा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमीनीचे वाद या योजनेने संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

👉🏻खेडे गावात जमीन या मुद्द्यावर खुप वाद होतात ते वाद संपतील व समाजात शांतता रहण्यास मदत होईल.

👉🏻आपली जमीन आपल्या मालकीची आपल्या ताब्यात असेल तर सपाटीकरण व सींचन यासारख्या मूलभूत सुधारना करु शकतो.

👉🏻कर्ज मीळवणे सोपे जाते

👉🏻आपल्या नावावर असणारीच जमीन आपल्या ताब्यात असेल तर भविष्यात निर्माण होणार्यां वाद  अधिच मीटु शकतात.






शेतकरी बांधवांनो शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकार राबवते,पण त्या योजनेचा लाभ हा शेतकरी पात्र असतानाही मीळु शकत नाही.याच कारण म्हणजे शेतकऱ्यांना या योजनाबाबत माहिती नसते. आपन आपल्या marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना या अज्ञाना पासुन दुर करुन ज्या शेतकरी बांधवाना  या योजनेची गरज आहे. त्याना त्या योजनेचा लाभ मीळवुन देण्यासाठी मदत करत आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.

Share:

आधार कार्ड अपडेट आणी डाउनलोड (adhar card update and download)

आधार कार्ड भारतात राहणार्यां प्रत्येक  व्यक्तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड नवीन निर्णयधार कार्ड माहिती मराठी  मध्ये देत आहोत. तसेच आधार कार्ड अपडेट का करावे, अधार कार्ड अपडेट साठी लागणारी कागदपत्रे, व अपडेट झालेल आधार कार्ड डाउनलोड मराठी माहिती (adhar card download marathi)  घर बसल्या मोबाईल वर कसे डाउनलोड करावे . या बद्दल सर्व माहिती येथे देत आहोत. 



आधार अपडेट का करण्याची गरज का?

👉🏻आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते.

👉🏻आयुष्यातील घटनेतील बदल उदाहरणार्थ विवाह यामुळे नाव व पत्ता यासारख्या मूलभूत जनसांख्यिक तपशीलांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे पत्ता व मोबाईल क्रमांकामध्येही बदल होऊ शकतो. रहिवाशांना आयुष्यातील विवाह तसेच नातेवाईकाचा मृत्यू यासारख्या घटनांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या तपशीलांमध्ये बदल करायचा असू शकतो. त्याचशिवाय, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी बदलण्यासाठी रहिवाशांची व्यक्तिगत कारणेही असू शकतात.

आधार अपडेट कसे करावे-:

तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

UIDAI च्या मते जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला काहि कागदपत्र आवश्यक असतात.पण कोणती कागदपत्र लागणार हे मात्र तुम्हाला काय अपडेट करायचे आहे, त्यावर अवलंबुन आहे. चला तर मग काय अपडेट करायला कोणती कागदपत्र पुरावा म्हणून  लागतात पाहुया.

ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-रेशन कार्ड 

3-मतदान कार्ड 

4-पासपोर्ट

5-ड्रायव्हींग लायसेन्स 

6-बँक पासबुक 

7-लाईट बील 

8-पाणी बील

जन्माचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-पासपोर्ट

3-मार्कशीट / गुण पत्रक 

4-जन्मचा दाखला

5-शाळा सोडल्याचा दाखला

नात्याचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पेन्शन कार्ड 

2-मनरेगा जाँब कार्ड 

3-पासपोर्ट

4-आर्मी कँन्टिन कार्ड 


सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. ( अधिकृत वेबसाइट - uidai.gov.in👇👇




 फोटो मध्ये दाखवल्याप्रमाने क्लिक करा त्यानंतर नंतर भाषा निवडावी लागेल . 👇👇




भाषा निवडल्यावर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल आणि नंतर आधार मीलवा (GET AADHAR) वर क्लिक करावे लागेल.(खालील फोटो पहा)👇👇




आधार मीळवा (GET AADHAR) वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला आधार डाऊनलोड करा (DOWNLOAD AADHAR) वर क्लिक करावे लागेल.👇👇



 त्यनंतर ई-आधार चे अधिकृत वेबपेज तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्ही login वर क्लिक करा.👇👇



त्यानंतर खालीप्रमाने पेज दिसेल तेथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 14 अंकी नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्यूअल आयडी टाकावा लागेल आणि कॅप्चा पडताळणी कोड टाकावा लागेल आणि SEND OTP बटणावर क्लिक करावे लागेल.👇👇




👉🏻 त्यानंतर तुमच्या आधार नोंदणी ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल आणि तो प्रविष्ट केल्यानंतर login बटणावर क्लिक करा.

👉🏻 त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या समोर येईल आणि तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता.

👉🏻 केल्यानंतर उघडा

👉🏻 जेव्हा तुम्ही ते उघडता तेव्हा तुम्हाला ते उघडण्यासाठी कोड टाकावा लागतो.

👉🏻 आधार कार्ड PDF साठी पासवर्ड 8 अंकी/ वर्णांचा आहे.

👉🏻 तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे कॅपिटल अक्षरांमध्ये (आधार कार्डवरील नावानुसार) आणि YYYY फॉरमॅटमध्ये जन्माचे वर्ष एकत्र करून पासवर्ड तयार केला जाईल.
{{समजा तुमचे नाव AISHWARYA असेल आणि तुमची जन्म वर्ष 2003असेल तर तुमचा पासवर्ड AISH2003 असा असेल.हे फक्त उदाहरणार्थ होत. तसा तुम्ही तुमचा पासवर्ड टाकुन आधार बघु शकता.}}
 


👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.

 मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.



केंद्र सरकार ने पी एम किसान योजनेच्या लाभार्थांला ई-केवासी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुवीधा उपलब्ध करुन दिली आहे.यामुले आता शेतकर्‍यांना स्वताचे किंवा इतरांचे सुध्दा केवासी घर बसल्या करता येणार आहे. चला तर मग ई-केवायसी कशी करावी ते पाहुया.

आणखी वाचा>>शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.

सर्वप्रथम आपल्या मोबाइल मध्ये असलेले जुने पीएम किसान अँप काडुन टाका 

                       👇👇👇

त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टेअर (play store) मध्ये जाऊन  pmkisan GoI हे अँप स्थापित करा (Install) करा.



                           👇👇👇

अँप स्थापित(Install) केल्यावर ते उघडा (ओपन करा) 

                          👇👇👇

त्यानंतर हिंदी किवा इंग्रजी भाषा निवडावी.     

                         👇👇👇

 त्यानंतर New Farmer Registration आणि Login यापैकी 'पीएम किसान' योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. ॲप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक

                          👇👇👇

त्यानंतर Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून 'पीएम' किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी तेथे आपला आधार नंबर टाकावा व GET OTP बटनावर क्लिक करावे. त्यानंतर जनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल तो आलेला चार अंकी OTP टाकावा व Login करावे.

                            👇👇👇

त्या नंतर स्वताचा सहा अंकी MPIN तयार करावा, कारण पुढच्या प्रक्रिया करताना याचा ऊपयोग करुन आपण केवायसी करणे व लाँग इन करणे सोपे होते.

                            👇👇👇

त्यानंतर ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबितटट असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल.

                           👇👇👇

त्यानंतर जर त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबित असेल तर  "click hear to complete your e-kyc" यावर क्लिक करावे.

                          👇👇👇


आणखी वाचा >>किसान क्रेडिट कार्ड योजना 


त्यावर क्लिक केल्यावर थोड्या वेळापुर्वी तयार केलेला सहा अंकी MPIN टाकावा व consent form वर क्लिक करा.

                          👇👇👇

त्यानंतर scan face वर क्लिक करा. नंतर तुम्हाला faceRd app not install on your divice असं येईल नंतर त्याला ok करा.

                          👇👇👇

नंतर प्ले-स्टोअर वर adhar facrRd हे अँप स्थापित  (Install) करुन ते ओपन करा. 

                         👇👇👇

ते अँप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर computing face सुरु होईल नंतर समोर येणाऱ्या सुचनांचे पालन करुन procedd वर क्लिक करा. व मोबाईल चेहरा निट दिसेल अशा प्रकारे धरुन scan face करा. नंतर चेहरा स्कँन झाल्यावर image capture successful असं दिसेल.व आपल्या मोबाईलवर sucessful e-kyc अहा संदेश दिसेल. म्हणजेच तुमची e-kyc झाली.

                       👇👇👇

नंतर जर आपल्याला इतर कोनाची e-kyc करायची असेल तर e-kyc for other beneficiaries वर जाऊन वरी सांगितल्या प्रकारे करु शकता.

आणखी  वाचा >>1 रुपयात पिक विमा

आणखी वाचा >>बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

कीसान क्रेडिट कार्ड(kisan credit card scheme)

काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme) किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc) किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)किसान क्रेडिट कार्ड तक्रारीसाठी हेल्पलाईन नं , किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?




भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान ,पाऊस हे प्रमुख घटक आहेत. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.


काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme)-:


👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते.

👉🏻किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड  द्वारे तयार करण्यात आली.

👉🏻कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली.

👉🏻हे त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करते.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)-:

👉🏻सर्व शेतकरी-व्यक्ती/संयुक्त कर्जदार जे मालक शेती करणारे आहेत .भाडेकरू शेतकरी, तोंडी भाडेपट्टेदार आणि शेअर क्रॉपर्स इ. एसएचजी किंवा शेतकऱ्यांचे संयुक्त उत्तरदायित्व गट ज्यात भाडेकरू शेतकरी, शेअर पीक घेणारे, इत्यादि 

👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारी पात्रता
लाभार्थी शेतकरी असावा त्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे व 70 पेक्षा जास्तहि नसावे. जर कर्जदार हा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल व घ्यायचे असेल तर  60 वर्षापेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.


किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc)-:

👉🏻आधारकार्ड, पैन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट (कोणताही एक)

👉🏻सातबारा उतारा

👉🏻बँक अकाउंट माहिती

👉🏻 मोबाईल नंबर

👉🏻अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

👉🏻वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु वरील काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे

👉🏻किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)-:

👉🏻या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.

👉🏻 सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.

👉🏻शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते...

👉🏻केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येते जे कर्ज फेडण्यासाठी योग्य कालावधी देते.

👉🏻शेतकरी बँकेने त्यांना दिलेली पत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. बँक शाखा व किसन क्रेडिट कार्ड पासबुकवर उपलब्ध पैसे काढण्याच्या स्लिपचा वापर करुन रोख रक्कदिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी  4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज कसा करावा -:


सरकारनं पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे तो डाउनलोड करुन भरुण घ्यावा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत घेऊन जायचा आहे. त्यासोबत सातबारा उतारा आणि 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रं घेऊन जावी लागणार आहेत.एकदा तुम्ही ही कागदपत्रं बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत.

किसान क्रेडिट कार्ड योजना आँनलाईन अर्ज कसा करावा-:

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही सेवा फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.

तक्रारीसाठी हेल्पलाईन( helpline )-:

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात जर शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर ते आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरुनही आपली तक्रार नोंदवू शकता. 

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.
Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels