पोलीस पंचनामा

पोलिस पंचनामा म्हणजे काय व पंचनाम्याचे प्रकार. पोलिस पंचनामा कसा करतात. पंचनाम्यात काय असते ? पंचनामा का करतात ?

    


पोलिस तपासातील पंचनामा हा महत्त्वाचा भाग आहे. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळविण्याच्या दृष्टीने पंचनामा महत्त्वाचा मानला जातो. पंचनामा म्हणजे घडलेल्या अपराधाची सर्व माहिती सांगणारा महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. गुन्हा नेमका काय होता ,गुन्हा कोठे घडला, कसा घडला, केव्हा घडला आणि का घडला या सर्व प्रश्नांचे उत्तर पंचनाम्यामध्ये मिळून येते. पंचनाम्याचे पुढील पाच प्रकार असतात . तपासाच्या वीवीध टप्प्यावर पंचनामा करण्यात येतो चला तर मग आपण पाहुया कोणकोणत्या प्रकारचा पंचनामा असतो. पंचनाम्यात काय असते.पोलिस पंचनामा का करतात.पंचनाम्याचे प्रकार किती व कोणते.अशा अनेक प्रश्नाची उत्तरे यामध्ये पाहुया 


घटनास्थळ पंचनामा-:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 157(1) या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही दखलपात्र अपराध घडल्यानंतर पोलीस अधिकारी त्याची नोंद करून शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी घटनास्थळी . घटनास्थळी पाहिलेल्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी घटनास्थळ पंचनामा करण्यात येतो. ज्या ठिकाणी अपराध घडला आहे तेथील निश्चित स्थानाचे आकलन होण्याच्या दृष्टीने घटनास्थळ पंचनामा महत्त्वाचा आहे. या पंचनाम्यात घटनेचे निश्चित स्थान, भौगोलिक स्थान तसेच स्थावर व भौतिक वस्तू, दिशा यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळते. तसेच घटनास्थळावर अपराधाच्या तपासाच्या दृष्टीने पुरावा म्हणून उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून या वस्तू पंचाच्या सहीने ताब्यात घेता येतात. अपघात किंवा इतर प्रसंगात घटनास्थळाचा पंचनामा करतांना मोजमाप घेवून इतर अधिकाऱ्यांकडून नकाशा तयार करतात. असा नकाशा, चित्र, टीपा यांचेसह हा पंचनामा न्यायालयात पुरावा म्हणून हजर करता येतो. या पंचनाम्याचे खुप महत्व असते.


अटक पंचनामा किंवा अंगझडती पंचनामा -:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 51 व 52 या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही अपराध घडल्यानंतर त्या अपराधाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीस अटक करतात. अटक केल्यानंतर त्या व्यक्तीची अंगझडती घेतली जाते त्यालाच अटक पंचनामा असे म्हणतात. यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला तिला अटक का केली, कुठे केली, कशाबाबत केली याची माहिती देण्यात येते. तसेच त्या व्यक्तीच्या अंगावरील जखमा, व्रण, चीजवस्तू यांचा उल्लेख करण्यात येतो. त्या व्यक्तीजवळ आढळून आलेल्या वस्तू पंचाच्या सहीसह ताब्यात घेतल्या जातात. त्या वस्तू त्या व्यक्तीला नंतर परत करता येतात. परंतु पुरावा म्हणून उपयोगी पडणाऱ्या वस्तू, हत्यारे किंवा इतर संशयास्पद वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून त्या वस्तु जप्त करण्यात येतात. महीला आरोपी असतील तर महीला पंचाची आवश्यकता असते.


मालमत्ता पंचनामा -:

 हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 165(1) व कलम 100(5)या कलमान्वे करण्यात येतो. या पंचनाम्यामध्ये  वेगवगळ्या  प्रकारच्या अपराधांमध्ये मुद्देमाल किंवा चीजवस्तू जप्त केल्या जातात. अशा अपराधांमध्ये तसेच उघड्या जागेवर पडलेला माल, बेवारस वस्तू, गुन्ह्याच्या पुराव्यासंबंधीचे हत्यार, चोरीचा माल, प्रेत अशा अनेक प्रकारच्या वस्तू मालमत्ता पोलीस तपासासाठी ताब्यात घेतात. अशावेळी याठिकाणी जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात येतो. यामध्ये त्या वस्तूचे, मालमत्तेचे नाव, वर्णन करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेतल्या जातात.


इन्क्वेस्ट पंचनामा-:

एखाद्या व्यक्तीचा अकस्मात, संशयास्पद किंवा अपघातात मृत्यू झाला तर तिच्या मृतदेहाचा पंचनामा करतात. या पंचनाम्यास इन्क्वेस्ट पंचनामा असे म्हणतात. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 (1) प्रमाणे मरणोत्तर चौकशी करण्यात येते. या कलमाप्रमाणे करण्यात येणाऱ्या पंचनाम्यामध्ये मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे वर्णन, तिच्या शरीरावरील खुणा, व्रण तसेच तिच्या अंगावरील चीजवस्तू तसेच अंगावर दिसत असलेल्या जखमा, मृतदेहाच्या आसपास मिळून आलेल्या वस्तू, हत्यार याची माहिती देण्यात येते. मृतदेहाच्या जवळपास सापडलेल्या वस्तू पुरावा म्हणून उपयोगात येतात. म्हणून त्या सर्व वस्तू व हत्यार यांचा पंचनामा करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेण्यात येतात. इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यास आहे. हा पंचनामा केल्यानंतर मृतदेह वैद्यकीय शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठविण्यात येतो. अशा प्रकारे इन्क्वेस्ट पंचनामा करतात.


 मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा-:

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 27 प्रमाणे मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा करण्यात येतो. अटक केलेल्या आरोपीने त्या गुन्ह्याशी संबंधित एखादे हत्यार किंवा वस्तू किंवा मुद्देमाल काढून दिल्यानंतर त्यासंबंधी आरोपीने केलेले निवेदन पंचासमोर लिहून घेतात. त्यालाच मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा असे म्हणतात. या पंचनाम्यावर आरोपी, पंच, पोलीस अधिकारी यांची सही असते. आरोपीने निवदेन पंचनामा लिहून दिल्यानंतर तो सांगेल त्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन तेथे आढळून येणाऱ्या वस्तू, हत्यार ताब्यात घेता येतात. ताब्यात घेतल्यानंतर त्यावर पंचाच्या सह्या घेण्यात येतात. याला मेमोरंडम पंचनामा असे म्हणतात. 

आणखी वाचा >> FIR व NCR म्हणजे काय? 


अशा प्रकारची कायद्यासंबधी महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

Share:

FIR v/s NCR


FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात.


     


आपल्यासारखा  सामान्य माणुस पोलीस व पोलिस चौकी या पासुन ४ हात लांब राहणे पसंत करतो.पण तरीही बहुतेक लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पोलिस स्टेशन बरोबर संबंध येतच असतो.आणी मग आपल्या कानावर काहि शब्द पडतात. त्यातील महत्वाचे शब्द म्हणजे FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) यातील NCR(एन सी आर) याला आपल्या बोली भाषेत फक्त NC (एन सी) एवढच म्हटलं जातं . गुन्हा घडल्यानंतरची न्याय मीळण्याची पहिली पायरी म्हणजे गुन्ह्याची नोद करणे. गुन्हा नोंदवताना आपल्याला काहि गोष्टी माहित असणे आवश्यक असते.जसं की FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात. यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे या लेखामधुन आपण पाहणार आहोत. चला मग पाहुया.


FIR (एफ आय आर)  म्हणजे काय व कसा नोंदवतात-:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 154 अन्वये पोलिस वर्दी देणाऱ् व्यक्तिने प्रथम दिलेली माहिती पोलीस लीहुन घेतात त्यालाच FIR (FIRST INFORMATION REPORT ) प्रथम माहिती अहवाल असे म्हणतात.दखलपात्र अपराध घडल्याची वर्दी पोलीस ठाण्याच्या अंमलदारास लेखी व तोंडी देण्यात आली असेल तर, तो ती लिहून घेईल. वर्दी देणाऱ्याला वाचून दाखवण्यात येईल. त्यावर वर्दी देणाराला सही करावी लागेल.सही करता येत नसेल तर अंगठा करावा पण अगोदर आपण जी माहिती दिली ती सांगीतल्या प्रमाने असल्याची खात्री करावी व नंतरच अंगठा किंवा सहि करावी अन्यथा करु नये. नंतर पोलिस ती वर्दीची नोंद राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात व विहित अधिकाऱ्याने ठेवावयाच्या पुस्तकात केली जाईल.

परंतु भारतीय दंड संहीता १८६० चे 
कलम ३२६अ, ३२६ब-अँसिड हल्ला
 कलम ३५४ ते ३५४ड- विनयभंग
कलम ३७६ ते ३७६इ-बलात्कार
कलम ५०९ - हावभाव व अवाज करुन विनयभंग 

या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेल्या स्त्रीने वर्दी दिली असेल तर ती वर्दी महिला पोलिस अधिकाऱ्याकडून किंवा अन्य महिला अधिकाऱ्याकडून लिहून घ्यावी.
जर या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेली स्त्री दिव्यांग असेल तर पोलिस अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानी व तिच्या सोयीच्या ठिकाणी दुभाषाच्या व विशेष शिक्षण देणाऱ्याच्या उपस्थित ती वर्दी लिहून घ्यावी.
FIR प्रथम खबर नोंदवलेल्या माहितीची प्रत वर्दी देणाऱ्यास त्वरित विनाशुल्क दिली जाते.

पोलिस FIR फाडण्यास पोलिस टाळाटाळ केल्यास काय करावे -:


प्रथम खबर नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याने नकार दर्शवल्याने नाराज झालेली व्यक्ती ती माहिती लिखित स्वरूपात व टपालाने संबंधित ( SP ) पोलिस अधिक्षकाकडे पाठवू शकते. त्या माहितीने दखलपात्र अपराध उघड झाल्याबाबत पोलिस अधीक्षकाची खात्री झाल्यास एकतर तो स्वतः तपास करील अन्अयथा धिनस्थ अधिकाऱ्याकडून तपास करण्याचा आदेश देईल.

NCR (एन सी आर) म्हणजे काय -:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 155 नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदारास त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अदखलपात्र अपराध घडल्याची वर्दी देण्यात आली असेल तेंव्हा, तो अधिकारी राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात ठेवावयाच्या पुस्तकात त्या वर्दीच्या नोंद करील वा करवील शिवाय त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे पाठवील. कारण यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस क्रृती करतात स्व:ता दखल देण्याचा अधिकार नसतो.
अदखलपात्र प्रकरणाचा तपास कोणताही पोलिस अधिकारी त्या खटल्याची संपरीक्षा करण्याचा व तो खटला संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय करणार नाही. न्यायालयाकडून तपासाचा आदेश मिळालेला पोलिस अधिकारी हा पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी दखलपात्र प्रकरणात वापरू शकत असलेले अधिकार वापरू शकतो.

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.






Share:

आर,गुंठा,एकर,हेक्टर,बिघा,म्हणजे कीती?

आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.



शेतकर्‍यांचा संबंध येणारा सर्वात महत्वपूर्ण कागद म्हणजे ७/१२ उतारा,तो उतारा वाचत असताना आपण काही शब्द बघतो ते म्हणजे आर,गुंठा, त्याच बरोबर इतरही शब्द तुमच्या कधी न‌ कधी कानावर पडले असतील जसे की एकर,हेक्टर,बिघा  हे शब्द वाचतान तुम्हालाही कधी-कधी प्रश्न पडत असेल नेमक हे शब्द आहेत काय हे कसे तयार झाले . चला तर मग या लेखा मधुन आपण समजुन घेऊया,आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.आर,गुंठा,एकर,हेक्टर,बीघा म्हणजे काय ?






खरं तर हे आर, गुंठा, एकर, हेक्टर, बिघा हे जमीन मोजण्याची एकके आहेत.

आर म्हणजे काय -:


आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. यामध्ये काय करतात तर जमीनीच मोजमाप मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.

गुंठा म्हणजे काय -:



पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत होती  त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.

गुंठा : १ गुंठा जमीन = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
 

एकर म्हणजे काय -:


एकर हे जमिन मोजण्याचे आपल्याकडील प्रसिद्ध एकक आहे.

 १ एकर = ४०४६.८७२६ चौरस मीटर.

 १ एकर = ४० गुंठे. 

 म्हणजेच  १ एकर जमीन = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर ( साधारणत: चाळीस गुंठे म्हणजे एक एकर)


अशा प्रकारे एक एकर तयार होतो.


हेक्टर म्हणजे काय-:



आपल्याकडे जमीन किंवा शेत जमीन ही हेक्टर मध्ये मोजली जाते. ४० गुंठ्यांचा मिळून १ एकर बनतो. १ गुंठा ३३ बाय ३३ फुटांचा असतो. एक हेक्टर म्हणजे किती एकर याचं उत्तर २.४७ एकर होय. याचाच अर्थ की ९८.८ गुंठा जमीन म्हणजे १ हेक्टर होय. १०००० चौरस मीटर चा एक हेक्टर होतो.

थोडक्यात हेक्टर (हे.) = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर (अडीच एकर म्हणजे एक हेक्टर) शंभर गुंठे किंवा शंभर आर म्हणजे एक हेक्टर (आर - हा शब्द 7/12 वर वापरला जातो)


बिघा म्हणजे काय -:


बघा हा शब्द भारतीय बोलीभाषेत आहे.पण प्रत्येक प्रदेशातील ठिकाणानुसार त्याचं परिमाण बदलतं

👉 बिहार मध्ये एक बीघा म्हणजे 2529.2 वर्ग मीटर

 👉राजस्थान मध्ये 2500 वर्ग मीटर

 👉बंगाल मध्ये. 1333.33 वर्ग मीटर

 👉आसाममध्ये 14,400 चौरस फूट (1337.8 चौरस मीटर).

 👉महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा (आर), एकर, हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत.

थोडक्यात काय तर -:
 
1 हेक्टर = 10000 चौ. मी. 1 एकर = 40 गुंठे.

1 गुंठा = [33 फुट x 33 फुट ] =

1089 चौ फुट.

1 हेक्टर = 2.47 एकर = 2.47 x 40 =

98.8 गुंठे.

1 आर = 1 गुंठा.

1 हेक्टर = 100 आर.

1 एकर = 40 गुंठे x [33 x 33] =

43560 चौ फुट.

1 चौ. मी . = 10.76 चौ फुट .

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.




Share:

‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय?

 ‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय व कसे बनवावे ?‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्डचे फायदे ,‌‌‌‌‌ मनरेगा जाँब कार्डसाठी कागदपत्रे व प्रोसेस काय असते . 





जाँब कार्डची गरज काय-:

जॉब कार्ड जॉब कार्ड ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जारी केले जाते. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत बनवलेले एक कार्ड आहे.ज्याद्वारे ते प्रत्येक वर्षात कोणतेही अकुशल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायद्यानुसार 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा मागण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.या जॉब कार्डने लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी दीली आहे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील या कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉब कार्डमध्ये नोंदवली जाते. यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जॉब कार्ड दिले जातात.

जाँब कार्डमध्ये काय असते-:

या कार्डमध्ये खालील माहिती असते

👉 जाँब कार्ड क्रमांक.

👉उमेदवाराचे नाव. 

👉वडील किंवा पतीचे नाव. 

👉पंचायत व जिल्ह्याचे नाव.

👉ग्रामसभेचे नाव.

👉वय.

👉लींग.


जाँब कार्ड कसे बनवावे -:

जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जावे लागेल. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा. त्याला भरून ते सांगतील ते आवश्यक कागदपत्रे जोडुन त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापरुन तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

मनरेगा जाँब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-:

 👉उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र.

👉 अर्जाचा नमुना.

 👉पासपोर्ट आकाराचे फोटो.

 👉पत्त्याचा पुरावा.

 👉रेशन कार्ड.

 👉आधार कार्ड.

👉पासबुक.

 👉मोबाईल नंबर.

जॉब कार्डवर ऑनलाइन नाव कसे पहावे-:

सर्वप्रथम जॉब कार्डच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in  वर जा. येथे दिलेल्या लिंकद्वारे थेट वेबसाइटवर जाण्यास येथे क्लिक करा.

                        👇

जॉब कार्ड वेबसाइट उघडल्यानंतर, ग्रामपंचायत अंतर्गत अहवाल तयार करा – जॉब कार्ड पर्याय निवडा.

                           👇

आता सर्व राज्यांची यादी उघडेल. त्यात तुमच्या राज्याचे नाव शोधा आणि ते निवडा.

                            👇

यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. यामध्ये प्रथम आर्थिक वर्ष निवडा. यानंतर तुमच्या जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.

                             👇

आता जॉब कार्डशी संबंधित माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. जॉब कार्डमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी R1 बॉक्समधील JobCard/Employment Register पर्याय निवडा.

यानंतर, तुम्ही निवडलेल्या ग्रामपंचायतीची जॉबकार्ड यादी उघडेल. तुम्ही जॉब कार्डमध्ये तुमचे नाव येथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही आँनलाईन नआव व इतर तपशील संकेतस्थळावर पाहु शकत.


आणखी वाचा >> 1 रुपयांत काढा पिक विमा.


मनरेगा जाँब कार्डचे फायदे-:

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, लाभार्थ्याला 100 दिवसांचा रोजगार मिळतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नरेगा जॉब कार्ड दिले जाईल.

 👉या योजनेंतर्गत लोकांना त्यांच्याच क्षेत्रात काम मिळते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही.

👉या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजगार मिळु शकेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

 👉जॉब कार्डमध्ये अर्जदार आपले नाव आणि जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातही लाभ दिला जातो.

👉 जॉब कार्डद्वारे भारतातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

👉नरेगा जॉब कार्डमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 देशातील सर्व राज्यातील गरीब लोक जॉब कार्डचा लाभ घेऊ शकतात.

 👉नरेगा जॉब कार्डची सुविधा ऑनलाइन असल्याने अर्जदाराचा वेळही वाचतो.

👉जॉब कार्डमध्ये तुम्हाला मनरेगा योजनेद्वारे मिळणार्‍या कामाची सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.

👉अर्ज केल्याच्या १५ दिवसांत काम न मिळाल्यास नियमितपणे बेरोजगार भत्ता दिला जाईल.

 👉योजनेंतर्गत नोकरीसाठी केवळ प्रौढ सदस्य पात्र आहेत.

👉 प्रत्येक प्रकल्पात किमान एक तृतीयांश महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.

 👉कामाचे ठिकाण ५ कि.मीच्या असते बाहेर असल्यास, कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता दिला जातो.

 👉महिला आणि वृद्धांना त्यांच्या परिसरात काम करण्यास प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा >> जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना 


मनरेगा योजनेंतर्गत सर्व कामगारांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामगारांसाठी अधिकृत मोबाइल अप्लिकेशन सुरू केले आहे. ज्यातून तुम्ही घरबसल्या नरेगाशी संबंधित माहिती मिळवू शकता. अँप डाउनलोड करण्यासाठी 👇👇

                येथे क्लिक करा.





हे अँप डाउनलोड करून‌ तुम्ही सर्व माहिती मोबाइल मध्ये बघु शकता. 


ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

 आणखी वाचा >> भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग 1मध्ये  कशी आणायची 


आणखी वाचा >>  लंपी विषाणू मराठी माहिती.

Share:

लंपी विषाणू लागण,कारणे,प्रादुर्भाव,उगम,प्रसार मराठी माहिती.

काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात  प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती. 




 नुकताच कोरोना वायरस नंतर गुरांमध्ये लंपी या रोगान थैमान घातले होते. लंपी  हा त्वचाचा रोग आहे असुन यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो. हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा या रोगचे प्रमाण अधिक असते.

काय आहे लंपी विषाणू-:

👉 रोगाला कारणीभूत विषाणू -: Lumpy Skin Disease Virus (LSDV)

👉 विषाणूची प्रजाती (Genus) - Capripoxvirus

👉लंपी विषाणूचे कुल (Family) - Poxviridae ( देवी आणि मंकीपॉक्स विषाणू याच कुळातील आहेत.)

👉 हा Zoonotic विषाणू नाही. याचा अर्थ हा रोग मानवांमध्ये पसरू शकत नाही. हा एक संसर्गजन्य रोग आहे. डास, चावणाऱ्या माश्या आणि गोचिड यांसारख्या वाहकांद्वारे पसरतो. सहसा गायी आणि म्हशींसारख्या प्राण्यांना प्रभावित करतो.

👉हा रोग वाहकांच्या थेट संपर्काद्वारे किंवा दूषित चारा आणि पाण्याद्वारे पसरतो. तसेच कृत्रिम गर्भाधान (बीजारोपण) करताना प्राण्यांच्या वीर्याद्वारे पसरू शकतो.

👉 झालेल्या प्राण्याच्या 'Lymph Nodes' वर (लसिकांवर) परिणाम होतो, ज्यामुळे नोड्स वाढतात आणि त्वचेवर गुठळ्यांसारखे दिसतात. त्यामुळे या रोगास लम्पी असे नाव पडले.

लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात प्रसार -:


👉हा रोग पहिल्यांदा झांबियामध्ये १९२९ मध्ये दिसून आला.

👉नंतर बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. 

👉 त्यानंतर पश्चिम आशिया, आग्नेय युरोप आणि मध्य आशिया आणि अलीकडेच २०१९ मध्ये दक्षिण आशिया आणि चीनमध्ये पसरला.

👉FAO नुसार हा रोग सध्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, पश्चिम आशियाचा काही भाग (इराक, सौदी अरेबिया, सीरियन अरब प्रजासत्ताक) आणि तुर्कीमध्ये प्रदेशनिष्ठ रोग आहे.

👉दक्षिण आशियामध्ये प्रथम जुलै २०१९ मध्ये बांग्लादेशात पसरला. 

👉 ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात पोहोचला. सुरुवातीची प्रकरणे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आली. भारतात अलीकडील प्रसार जास्त प्रसार सुरू झाला आहे.


लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव-:


👉हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो.

👉 विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा रोगबाधेचे प्रमाण अधिक असते .

👉 सर्व वयोगटातील (नर व मादी) जनावरात आढळतो. लहान वासरात तुलनेत प्रमाण अधिक असते.

👉 उष्ण व दमट हवामान रोगप्रसारास पोषक ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास , गोचीड, चिलटे  यांच्यामार्फत होतो.

👉 आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काहीवेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.

👉 त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते.

👉गाई गाबन असल्यास गर्भपात होऊ शकतो.

लंपी रोगाची लक्षणे-:

 👉जर एखाद्या प्राण्याला या लंपी विषाणूची लागण झाली तर सर्वप्रथम त्या ताप येऊ लागतो आणि ते जनावर सुस्त होऊ लागते.

 👉जर एखाद जनावर या विषाणूच्या पकडीत आली तर त्याच्या डोळ्यातून आणि नाकातून स्राव होतो आणि तोंडातून लाळ टपकू लागते.

 👉जेव्हा गाईला हा आजार होतो तेव्हा त्या गायीची दूध देण्याची क्षमता कमी होते.

👉 जेव्हा एखादी गाय या विषाणूच्या कचाट्यात येते तेव्हा त्या गायीच्या अंगावर फोड येऊ लागतात आणि त्या युक्तीमुळे त्या गायीला खूप त्रास होऊ लागतो.

 👉सतत ताप.

 👉वजन कमी होणे.

 👉लाळ येणे.

👉वाहणारे नाक आणि डोळे

👉दुधाची कमतरता जाणवणे.

 👉वेगवेगळ्या प्रकारचे फोड्या दिसणे.

 👉अंगावर पुरळ सारखे गुठळ्या.

लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय -:

👉जर एखाद्या जनावरात हा विषाणू आढळला तर त्याला बाकीच्या जनावरापासून वेगळ ठेवा जेणेकरून ती इतर प्राण्यांमध्ये पसरू नये.

 👉कारण हा रोग माश्या, डास आणि कुंड्यांमुळे देखील पसरतो, म्हणून आपल्या प्राण्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवा जेणेकरून या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला येऊ नयेत.

 👉ज्या वस्तूंमध्ये प्राणी अन्न खातात किंवा पाणी पितात त्या गोष्टी पूर्णपणे स्वच्छ ठेवाव्यात.

 👉तुमच्या जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉 जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉तुमच्या आजूबाजूला संसर्गग्रस्त भाग असल्यास त्या भागातून जनावरांची ये-जा थांबवा.

 👉संसर्ग झालेल्या प्राण्याभोवती जंतू मारणाऱ्या रसायनाची फवारणी करा.

 👉लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जनावराचा नमुना घेत असताना त्या वेळी तुम्हालाहि काळजी घ्यावी लागेल

लम्पी त्वचा रोगावर कोणतीही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते.म्हणुन होण्यापूर्वीच सावधान‌ राहणे गरजेच आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.







Share:

जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)

 जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)





सलोखा योजना मराठी माहिती.सलोखा योजना पात्रता काय आहे.सलोखा योजना अटी व शर्तीं.सलोखा योजना अर्ज प्रक्रिया मराठी माहिती. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 50%पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. करोना सारख्या महामारीत सर्व क्षेत्र बंद असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरुन धरले होते.एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मालकी हक्काचे वाद, शेत बांदाचे वाद, जमिनीचा ताबावाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, हस्तांतरणाचे वाद, भावंडाच्या वाटणीवरुन वाद, शासकीय नियोजनातील चुका यातुन उद्भवलेल वाद यां वादामुळे समाजात वातावरण दुषीत होत आहे. हे  शेताचे वाद अतीशय गुंतागुंतीचे व वेळाखाऊ असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू होतो. आता यातुन सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना नावाने एक योजना 3 जानेवारी 2023 पासून आणली आहे.अशा करुयात की या योजनेच्या नीमीत्ताने का होईना हे वाद संपतील.

सलोखा योजनेची अवश्यकता का आहे-:

पूर्वीच्या जमीनीचे छोटेछोटे सर्वे नंबर होते म्हणजे 1 गुंटे 2 गुंटे असे होते.त्यानंतर आणखी कुटुंब वाडत गेली व जमीनीचे आणखी लहान लहान तुकडे झाले परीणामी शेती मोजनी अडचणीचे झाले हि अडचण लक्षात घेता सरकारने 1947 साली कायदा करुन हे सर्वे नंबर एकत्र करुन काही मानके निश्चित करण्यात आली व गट नंबर देण्यात आले. याचा परीणाम असा झाला की शेती एक झाली परंतु  शेतीच्या ताब्यात घेण्यावरुन गोंधळ निर्माण झाला व शेती एकाच्या नावावर व वहीवाट करणारा दुसरा अशी परस्थिति झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जमीनीची वाटणी करत असताना जमीन नावावर एकाच्या आणी त्याची वहिवाट सोईनुसार दुसर्याकडे देण्यात आली पण नंतर आता पुढच्या पीढीत यावरून वाद निर्माण झाले आहेत. हे वाद सोडवणे आवश्यक होते म्हणून ही योजना आणावी लागली.


सलोखा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -:

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित वाद मिटविण्यासाठी त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल, आणि अर्ज सादर करावा लागेल. या योजने अंतर्गत जमीन एकाकडे व ताबा दुसर्याकडे अशा जमीनीचे व्यवस्थाीकरण करण्यासाठी नाममात्र 1000 रु शुल्क व नोदणी फी 1000 रुपये अकारुन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 

सलोखा योजनेचे निकष व अटी-:


👉🏻 हि योजना फक्त वाद मिटविण्यासाठी आहे इतर व्यापारी उद्देश्यासाठी नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचनामा अर्ज गावच्या तलाट्याकडे करावा लागेल. 

👉🏻तलाट्याला अर्ज प्राप्त झाल्यावर 15 दिवसाच्या आत पंचनामा करवा. 

👉🏻पंचनामा करताना दोन सज्ञान व्यक्तिचा पंचनामा नोंदवहीत नोदवणे गरजेच आहे.

👉🏻सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटातील सगळ्या शेतकऱ्यांची नोंदणीस संमती लागेल. ती नसल्यास अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंद व ताबा यांची अदलाबदल  किमान 12 वर्षांपासून असला पाहिजे.

👉🏻हि योजना पुढच्या 2 वर्षापर्यांत चालु राहील.

👉🏻नोदणी शुल्क अगोदर भराणे गरजेच आहे. 


सलोखा योजनेचे फायदे -:

👉🏻या योजनेचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे नाममात्र 1000 रुपये शुल्का आकारुन जमीनीचे व्यवस्थाीकरण म्हणजे अदल-बदल  करण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा आहे. 

👉🏻नंतर दुसरा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमीनीचे वाद या योजनेने संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

👉🏻खेडे गावात जमीन या मुद्द्यावर खुप वाद होतात ते वाद संपतील व समाजात शांतता रहण्यास मदत होईल.

👉🏻आपली जमीन आपल्या मालकीची आपल्या ताब्यात असेल तर सपाटीकरण व सींचन यासारख्या मूलभूत सुधारना करु शकतो.

👉🏻कर्ज मीळवणे सोपे जाते

👉🏻आपल्या नावावर असणारीच जमीन आपल्या ताब्यात असेल तर भविष्यात निर्माण होणार्यां वाद  अधिच मीटु शकतात.






शेतकरी बांधवांनो शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकार राबवते,पण त्या योजनेचा लाभ हा शेतकरी पात्र असतानाही मीळु शकत नाही.याच कारण म्हणजे शेतकऱ्यांना या योजनाबाबत माहिती नसते. आपन आपल्या marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना या अज्ञाना पासुन दुर करुन ज्या शेतकरी बांधवाना  या योजनेची गरज आहे. त्याना त्या योजनेचा लाभ मीळवुन देण्यासाठी मदत करत आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.

Share:

आधार कार्ड अपडेट आणी डाउनलोड (adhar card update and download)

आधार कार्ड भारतात राहणार्यां प्रत्येक  व्यक्तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड नवीन निर्णयधार कार्ड माहिती मराठी  मध्ये देत आहोत. तसेच आधार कार्ड अपडेट का करावे, अधार कार्ड अपडेट साठी लागणारी कागदपत्रे, व अपडेट झालेल आधार कार्ड डाउनलोड मराठी माहिती (adhar card download marathi)  घर बसल्या मोबाईल वर कसे डाउनलोड करावे . या बद्दल सर्व माहिती येथे देत आहोत. 



आधार अपडेट का करण्याची गरज का?

👉🏻आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते.

👉🏻आयुष्यातील घटनेतील बदल उदाहरणार्थ विवाह यामुळे नाव व पत्ता यासारख्या मूलभूत जनसांख्यिक तपशीलांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे पत्ता व मोबाईल क्रमांकामध्येही बदल होऊ शकतो. रहिवाशांना आयुष्यातील विवाह तसेच नातेवाईकाचा मृत्यू यासारख्या घटनांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या तपशीलांमध्ये बदल करायचा असू शकतो. त्याचशिवाय, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी बदलण्यासाठी रहिवाशांची व्यक्तिगत कारणेही असू शकतात.

आधार अपडेट कसे करावे-:

तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

UIDAI च्या मते जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला काहि कागदपत्र आवश्यक असतात.पण कोणती कागदपत्र लागणार हे मात्र तुम्हाला काय अपडेट करायचे आहे, त्यावर अवलंबुन आहे. चला तर मग काय अपडेट करायला कोणती कागदपत्र पुरावा म्हणून  लागतात पाहुया.

ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-रेशन कार्ड 

3-मतदान कार्ड 

4-पासपोर्ट

5-ड्रायव्हींग लायसेन्स 

6-बँक पासबुक 

7-लाईट बील 

8-पाणी बील

जन्माचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-पासपोर्ट

3-मार्कशीट / गुण पत्रक 

4-जन्मचा दाखला

5-शाळा सोडल्याचा दाखला

नात्याचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पेन्शन कार्ड 

2-मनरेगा जाँब कार्ड 

3-पासपोर्ट

4-आर्मी कँन्टिन कार्ड 


सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. ( अधिकृत वेबसाइट - uidai.gov.in👇👇




 फोटो मध्ये दाखवल्याप्रमाने क्लिक करा त्यानंतर नंतर भाषा निवडावी लागेल . 👇👇




भाषा निवडल्यावर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल आणि नंतर आधार मीलवा (GET AADHAR) वर क्लिक करावे लागेल.(खालील फोटो पहा)👇👇




आधार मीळवा (GET AADHAR) वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला आधार डाऊनलोड करा (DOWNLOAD AADHAR) वर क्लिक करावे लागेल.👇👇



 त्यनंतर ई-आधार चे अधिकृत वेबपेज तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्ही login वर क्लिक करा.👇👇



त्यानंतर खालीप्रमाने पेज दिसेल तेथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 14 अंकी नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्यूअल आयडी टाकावा लागेल आणि कॅप्चा पडताळणी कोड टाकावा लागेल आणि SEND OTP बटणावर क्लिक करावे लागेल.👇👇




👉🏻 त्यानंतर तुमच्या आधार नोंदणी ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल आणि तो प्रविष्ट केल्यानंतर login बटणावर क्लिक करा.

👉🏻 त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या समोर येईल आणि तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता.

👉🏻 केल्यानंतर उघडा

👉🏻 जेव्हा तुम्ही ते उघडता तेव्हा तुम्हाला ते उघडण्यासाठी कोड टाकावा लागतो.

👉🏻 आधार कार्ड PDF साठी पासवर्ड 8 अंकी/ वर्णांचा आहे.

👉🏻 तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे कॅपिटल अक्षरांमध्ये (आधार कार्डवरील नावानुसार) आणि YYYY फॉरमॅटमध्ये जन्माचे वर्ष एकत्र करून पासवर्ड तयार केला जाईल.
{{समजा तुमचे नाव AISHWARYA असेल आणि तुमची जन्म वर्ष 2003असेल तर तुमचा पासवर्ड AISH2003 असा असेल.हे फक्त उदाहरणार्थ होत. तसा तुम्ही तुमचा पासवर्ड टाकुन आधार बघु शकता.}}
 


👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels