पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर हेे तुमच्यासाठी आहे.

 पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे.pancard link to adhar card marathi mahiti


पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांमध्ये या दोन्ही गोष्टी अनिवार्यपणे आवश्यक आहेत, तुम्ही त्यांच्याकडून अनेक सरकारी फायदेही मिळवू शकता, त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2023 आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.व तुम्ही पँनकार्ड चा वापर करु शकणार नाही त्यामुळे तुमच पँन आधार कार्डशी  लिंक आहे का नाही हे आम्ही तुम्हाला या पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती  पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे मराठी माहिती येथे येत आहोत चला तर मग पाहुया .

     


पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे कळेल?

तुम्हाला आधार-पॅन लिंक स्थिती तपासायची असल्यास तुम्ही खालील पध्‍दती ने चेक करु शकतात. चला तर पाहुया .


 सर्वप्रथम e-filing असं टाईप करुन गूगल ला सर्च करायच आहे.त्यानांतर तूम्हाला इनकम टैक्स डिपार्टमेंट ची वेबसाइट दिसेल     👇👇👇👇 

                     



 त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईटवर क्लिक केल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे वेबसाईट मध्ये तुम्हाला थोडसं खाली स्क्रोल करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर  लिंक आधार स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता .

                        👇👇👇


          



 

लिंक आधार स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन तेथे तुम्हाला तुमचा पँन क्रमांक खालील रकान्यात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता

                      👇👇👇


 पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली व्हिव लिंक आधार स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा.

                                👇👇👇

       


           

युवर पँन कार्ड आँलरेडी  लिंक इन गीव्हण your pan already linked to givan adhar आधार अशाप्रकारे तुमच्या समोर दिसेल. जरा अशा प्रकारचे नाँटिफीकेशन आले तर समजावे की आपलं पँन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे .

                               👇👇👇

     


 अशाप्रकारे स्क्रीन वर तुम्हाला दिसेल.

 आणखी वाचा >>आधार कार्ड अपडेट व डाउनलोड 


आणखी वाचा >> FIR व NCR काय फरक आहे 


आणखी वाचा >> मनरेगा जाँब कार्ड 

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक आहे?

आपल्या देशात अनेक लोक कर चोरी करतात, त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते, आणि पैसा जायला हवा, तेथे जात नाही, त्यामुळे देशाला किंवा राज्यालाही तोटा सहन करावा लागू शकतो, हे लक्षात घेऊन  पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे.  

 

 वरीवरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीही तुमचं पॅन कार्डआधार कार्डशी लिंक आहे का नाही हे मोबाईलवर पाहू शकता व वरी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व इतराना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी marathimahiti17.blogspt.com या वेबसाईटला भेट देत चला


Share:

ग्राम पंचायतीची कामे

ग्राम पंचायत हे खरे तर गाव स्तरावर लोकशाही पद्धतीने चालवणारे आणि सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करणारे सर्वात लहान संस्था आहे. गावाचा कारभार सांभाळणारी ही मुख्य संस्था आहे. ग्रामपंचायत माहिती आपण पाहात आहोत.त्याचे सदस्य आणि सरपंच निवडण्यासाठी ग्राम स्तरावर निवडणुका घेतल्या जातात. यामध्ये लोक मतदान करतात आणि पंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्डातुन सदस्य व सरपंच निवडुन येतात. ही निवडणूक 05 वर्षांसाठी असते. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक प्रकारची कामे केली जातात, ज्यामध्ये काही मुख्य कामे आपण ग्रामपंचायतीची कामे 2023 (grampanchyt kame in marathi 2023) येथे पाहणार आहोत. चला तर मग पाहुया.
    




ग्रामपंचायतीची कामे :-


जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या वित्तीय मर्यादेत ग्रामपंचायतीला प्रामुख्याने खालील कार्ये करावी लागतात.


१) आरोग्यविषयक कार्ये :-

 

 👉पिण्याच्या पाण्याची व तसेच जनावरांसाठी पाण्याची सोय करणे.

 👉 सार्वजनिक विहीर, रस्ते, गटारी इ. स्वच्छ ठेवणे.त्यांची विल्हेवाट लावणे, जेणेकरून आरोग्य अबाधित राहील..

👉 आरोग्याविषयी उपद्रवी गोष्टी थांबविणे तसेच मेलेली जनावरे गावाबाहेर पाठवून 

👉 स्मशानभूमीची योग्य प्रकारे व्यवस्था करणे. 

👉 बागा व खेळाच्या मैदानाची व्यवस्था करणे.

👉 सार्वजनिक मुतार्यां बांधणे.

👉 गावातील केरकरचना, अस्वच्छ खड्डे, गटारी व नाल्या इ. साफ करणे.

👉 बाल आरोग्यासंबंधी काळजी घेणे.


२) बांधकामविषयक कार्ये :-


👉 दिवाबत्तीची सोय करणे.

 👉सार्बजनिक रस्ते, गटारी, बांध, पूल इ. बांधणे व त्याची दुरुस्ती व देखरेख करणे. 

👉 बाजार टांगा व बैलगाडी स्थानकावर नियंत्रण ठेवणे.

 👉 खाटीकखान्याचे बांधकाम व देखरेख करणे.

👉 रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावणे आणि त्याच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी करून योग्य  प्रकारे जोपासना करणे.

👉 धर्मशाळा, कपडे धुण्याचे घाट, बाजारपट्टी बांधणे इ.

👉 शिक्षणाचा प्रसार करणे.

👉 व्यायामशाळा व करमणुकीची साधणे उपलब्ध करू देणे. 

 👉कला आणि संस्कृती यांची जोपासना करणे.

👉 सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाची व्यवस्था करणे.

 👉 गावातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कल्याणकारी कार्य हाती घेणे.

 उदा. गावात नशाबंदीसाठी प्रयत्न करून भ्रष्टाचार नाहीसा करणे. प्रौढ शिक्षणास उत्तेजन देणे. शेतीविषयक शिक्षण व माहिती देणे.


४)संरक्षणविषयक कार्ये :-


 👉गावाचे संरक्षण तसेच शेतीतील पिकांचे संरक्षण करणे इ.

👉 व्यापार व धान्यापासून जर नागरिकाच्या जीवनाला धोका होत असेल तर त्यावर कडक नियंत्रण ठेवणे.

👉 आगीपासून नागरिकाच्या जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे इ.


५) प्रशासनासंबंधी कार्ये :-


👉 गावातील वॉर्डाना व घरांना क्रमांक देणे.

👉 शेती व बिनशेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम ठरविणे. 

👉 ग्रामीण विकास योजना राबविण्यासाठी आवश्यक त्या पैशाची मागणी करणे. 

 👉केंद्र व राज्य सरकारने स्वीकृत केलेले पैसे गावाच्या विकासासाठी आणून ते योग्य प्रकारे खर्च करणे.

👉 विकास कार्याचे सर्वेक्षण करणे.

👉 विकास योजना तयार करणे.

👉 गाव मालकीची जमीन, बाजारपेठ, यात्रेकरू इ. वर नियंत्रण ठेवणे. 

👉 पंचायतीची सर्व कागदपत्रे तयार करून ठेवणे.

👉 गावातील लोकसंख्येची पर्यायाने जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे.


 आणखी वाचा >> FIR व NCR मधील फरक


६) कल्याणकारी कार्ये :-


👉 जमीन सुधारणासंबंधी कार्यात राज्य सरकारच्या अंमलबजावणीत मदत करणे. 

👉 अपंग, आजारी किंवा दारिद्री लोकांना मदत करणे.

👉 नैसर्गिक आपत्तीस त्रासलेल्या लोकांना मदत करणे.

👉 पडीत जमीन राज्य सरकारच्या परवानगीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन तिचा शेतीसाठी उपयोग करणे.

👉 गावातील लोकांचे सहकार्य घेऊन श्रमदानाने रस्ते तयार करणे व अशा कार्यातून ग्रामविकासात भर टाकणे.

👉 स्वस्त धान्याची दुकाने उघडणे.


७) शेतीविषयक कार्ये :-


👉 शेती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे व त्यात आदर्श शेती कशी बनविता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधणे. 

 👉धान्याचे कोठार बांधणे.

👉 शेती उत्पादनात किमान स्तर आणण्यासाठी प्रयत्न करणे. 

👉शेतीला  आवश्यक अशा नैसर्गिक खताचे रक्षण करणे. कंपोस्ट खते तयार करून त्याची विक्री करणे.

👉 सुधारित बी-बियाणे, कीटकनाशक औषधी आणि शेती उपयोगी शास्त्रीय अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देणे.

👉गायरान व वनांचे संरक्षण करणे.


८) इतर कार्ये : :-

👉 गावातील जनावरांचे रक्षण करणे आणि चांगल्या जनावरांची पैदास करण्यासाठी मदत करणे.

 👉गावात लहान लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे.

 👉 जमीन महसूल जमा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास मदत करणे व जमिनीचे योग्य रेकॉर्ड ठेवणे.

👉 ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आखलेल्या धोरणानुसार इतर कार्य करणे.

 👉 प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली मालमत्ता लिजवर देण्याचा किंवा विकण्याचा अधिकार असतो. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अत्यावश्यक आहे.

वरील विविध स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत करत असते.


आणखी वाचा >> पोलीस पंचनामा म्हणजे काय 


अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

Share:

पोलीस पंचनामा

पोलिस पंचनामा म्हणजे काय व पंचनाम्याचे प्रकार. पोलिस पंचनामा कसा करतात. पंचनाम्यात काय असते ? पंचनामा का करतात ?

    


पोलिस तपासातील पंचनामा हा महत्त्वाचा भाग आहे. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळविण्याच्या दृष्टीने पंचनामा महत्त्वाचा मानला जातो. पंचनामा म्हणजे घडलेल्या अपराधाची सर्व माहिती सांगणारा महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. गुन्हा नेमका काय होता ,गुन्हा कोठे घडला, कसा घडला, केव्हा घडला आणि का घडला या सर्व प्रश्नांचे उत्तर पंचनाम्यामध्ये मिळून येते. पंचनाम्याचे पुढील पाच प्रकार असतात . तपासाच्या वीवीध टप्प्यावर पंचनामा करण्यात येतो चला तर मग आपण पाहुया कोणकोणत्या प्रकारचा पंचनामा असतो. पंचनाम्यात काय असते.पोलिस पंचनामा का करतात.पंचनाम्याचे प्रकार किती व कोणते.अशा अनेक प्रश्नाची उत्तरे यामध्ये पाहुया 


घटनास्थळ पंचनामा-:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 157(1) या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही दखलपात्र अपराध घडल्यानंतर पोलीस अधिकारी त्याची नोंद करून शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी घटनास्थळी . घटनास्थळी पाहिलेल्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी घटनास्थळ पंचनामा करण्यात येतो. ज्या ठिकाणी अपराध घडला आहे तेथील निश्चित स्थानाचे आकलन होण्याच्या दृष्टीने घटनास्थळ पंचनामा महत्त्वाचा आहे. या पंचनाम्यात घटनेचे निश्चित स्थान, भौगोलिक स्थान तसेच स्थावर व भौतिक वस्तू, दिशा यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळते. तसेच घटनास्थळावर अपराधाच्या तपासाच्या दृष्टीने पुरावा म्हणून उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून या वस्तू पंचाच्या सहीने ताब्यात घेता येतात. अपघात किंवा इतर प्रसंगात घटनास्थळाचा पंचनामा करतांना मोजमाप घेवून इतर अधिकाऱ्यांकडून नकाशा तयार करतात. असा नकाशा, चित्र, टीपा यांचेसह हा पंचनामा न्यायालयात पुरावा म्हणून हजर करता येतो. या पंचनाम्याचे खुप महत्व असते.


अटक पंचनामा किंवा अंगझडती पंचनामा -:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 51 व 52 या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही अपराध घडल्यानंतर त्या अपराधाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीस अटक करतात. अटक केल्यानंतर त्या व्यक्तीची अंगझडती घेतली जाते त्यालाच अटक पंचनामा असे म्हणतात. यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला तिला अटक का केली, कुठे केली, कशाबाबत केली याची माहिती देण्यात येते. तसेच त्या व्यक्तीच्या अंगावरील जखमा, व्रण, चीजवस्तू यांचा उल्लेख करण्यात येतो. त्या व्यक्तीजवळ आढळून आलेल्या वस्तू पंचाच्या सहीसह ताब्यात घेतल्या जातात. त्या वस्तू त्या व्यक्तीला नंतर परत करता येतात. परंतु पुरावा म्हणून उपयोगी पडणाऱ्या वस्तू, हत्यारे किंवा इतर संशयास्पद वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून त्या वस्तु जप्त करण्यात येतात. महीला आरोपी असतील तर महीला पंचाची आवश्यकता असते.


मालमत्ता पंचनामा -:

 हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 165(1) व कलम 100(5)या कलमान्वे करण्यात येतो. या पंचनाम्यामध्ये  वेगवगळ्या  प्रकारच्या अपराधांमध्ये मुद्देमाल किंवा चीजवस्तू जप्त केल्या जातात. अशा अपराधांमध्ये तसेच उघड्या जागेवर पडलेला माल, बेवारस वस्तू, गुन्ह्याच्या पुराव्यासंबंधीचे हत्यार, चोरीचा माल, प्रेत अशा अनेक प्रकारच्या वस्तू मालमत्ता पोलीस तपासासाठी ताब्यात घेतात. अशावेळी याठिकाणी जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात येतो. यामध्ये त्या वस्तूचे, मालमत्तेचे नाव, वर्णन करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेतल्या जातात.


इन्क्वेस्ट पंचनामा-:

एखाद्या व्यक्तीचा अकस्मात, संशयास्पद किंवा अपघातात मृत्यू झाला तर तिच्या मृतदेहाचा पंचनामा करतात. या पंचनाम्यास इन्क्वेस्ट पंचनामा असे म्हणतात. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 (1) प्रमाणे मरणोत्तर चौकशी करण्यात येते. या कलमाप्रमाणे करण्यात येणाऱ्या पंचनाम्यामध्ये मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे वर्णन, तिच्या शरीरावरील खुणा, व्रण तसेच तिच्या अंगावरील चीजवस्तू तसेच अंगावर दिसत असलेल्या जखमा, मृतदेहाच्या आसपास मिळून आलेल्या वस्तू, हत्यार याची माहिती देण्यात येते. मृतदेहाच्या जवळपास सापडलेल्या वस्तू पुरावा म्हणून उपयोगात येतात. म्हणून त्या सर्व वस्तू व हत्यार यांचा पंचनामा करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेण्यात येतात. इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यास आहे. हा पंचनामा केल्यानंतर मृतदेह वैद्यकीय शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठविण्यात येतो. अशा प्रकारे इन्क्वेस्ट पंचनामा करतात.


 मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा-:

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 27 प्रमाणे मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा करण्यात येतो. अटक केलेल्या आरोपीने त्या गुन्ह्याशी संबंधित एखादे हत्यार किंवा वस्तू किंवा मुद्देमाल काढून दिल्यानंतर त्यासंबंधी आरोपीने केलेले निवेदन पंचासमोर लिहून घेतात. त्यालाच मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा असे म्हणतात. या पंचनाम्यावर आरोपी, पंच, पोलीस अधिकारी यांची सही असते. आरोपीने निवदेन पंचनामा लिहून दिल्यानंतर तो सांगेल त्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन तेथे आढळून येणाऱ्या वस्तू, हत्यार ताब्यात घेता येतात. ताब्यात घेतल्यानंतर त्यावर पंचाच्या सह्या घेण्यात येतात. याला मेमोरंडम पंचनामा असे म्हणतात. 

आणखी वाचा >> FIR व NCR म्हणजे काय? 


अशा प्रकारची कायद्यासंबधी महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

Share:

FIR v/s NCR


FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात.


     


आपल्यासारखा  सामान्य माणुस पोलीस व पोलिस चौकी या पासुन ४ हात लांब राहणे पसंत करतो.पण तरीही बहुतेक लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पोलिस स्टेशन बरोबर संबंध येतच असतो.आणी मग आपल्या कानावर काहि शब्द पडतात. त्यातील महत्वाचे शब्द म्हणजे FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) यातील NCR(एन सी आर) याला आपल्या बोली भाषेत फक्त NC (एन सी) एवढच म्हटलं जातं . गुन्हा घडल्यानंतरची न्याय मीळण्याची पहिली पायरी म्हणजे गुन्ह्याची नोद करणे. गुन्हा नोंदवताना आपल्याला काहि गोष्टी माहित असणे आवश्यक असते.जसं की FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात. यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे या लेखामधुन आपण पाहणार आहोत. चला मग पाहुया.


FIR (एफ आय आर)  म्हणजे काय व कसा नोंदवतात-:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 154 अन्वये पोलिस वर्दी देणाऱ् व्यक्तिने प्रथम दिलेली माहिती पोलीस लीहुन घेतात त्यालाच FIR (FIRST INFORMATION REPORT ) प्रथम माहिती अहवाल असे म्हणतात.दखलपात्र अपराध घडल्याची वर्दी पोलीस ठाण्याच्या अंमलदारास लेखी व तोंडी देण्यात आली असेल तर, तो ती लिहून घेईल. वर्दी देणाऱ्याला वाचून दाखवण्यात येईल. त्यावर वर्दी देणाराला सही करावी लागेल.सही करता येत नसेल तर अंगठा करावा पण अगोदर आपण जी माहिती दिली ती सांगीतल्या प्रमाने असल्याची खात्री करावी व नंतरच अंगठा किंवा सहि करावी अन्यथा करु नये. नंतर पोलिस ती वर्दीची नोंद राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात व विहित अधिकाऱ्याने ठेवावयाच्या पुस्तकात केली जाईल.

परंतु भारतीय दंड संहीता १८६० चे 
कलम ३२६अ, ३२६ब-अँसिड हल्ला
 कलम ३५४ ते ३५४ड- विनयभंग
कलम ३७६ ते ३७६इ-बलात्कार
कलम ५०९ - हावभाव व अवाज करुन विनयभंग 

या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेल्या स्त्रीने वर्दी दिली असेल तर ती वर्दी महिला पोलिस अधिकाऱ्याकडून किंवा अन्य महिला अधिकाऱ्याकडून लिहून घ्यावी.
जर या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेली स्त्री दिव्यांग असेल तर पोलिस अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानी व तिच्या सोयीच्या ठिकाणी दुभाषाच्या व विशेष शिक्षण देणाऱ्याच्या उपस्थित ती वर्दी लिहून घ्यावी.
FIR प्रथम खबर नोंदवलेल्या माहितीची प्रत वर्दी देणाऱ्यास त्वरित विनाशुल्क दिली जाते.

पोलिस FIR फाडण्यास पोलिस टाळाटाळ केल्यास काय करावे -:


प्रथम खबर नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याने नकार दर्शवल्याने नाराज झालेली व्यक्ती ती माहिती लिखित स्वरूपात व टपालाने संबंधित ( SP ) पोलिस अधिक्षकाकडे पाठवू शकते. त्या माहितीने दखलपात्र अपराध उघड झाल्याबाबत पोलिस अधीक्षकाची खात्री झाल्यास एकतर तो स्वतः तपास करील अन्अयथा धिनस्थ अधिकाऱ्याकडून तपास करण्याचा आदेश देईल.

NCR (एन सी आर) म्हणजे काय -:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 155 नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदारास त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अदखलपात्र अपराध घडल्याची वर्दी देण्यात आली असेल तेंव्हा, तो अधिकारी राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात ठेवावयाच्या पुस्तकात त्या वर्दीच्या नोंद करील वा करवील शिवाय त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे पाठवील. कारण यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस क्रृती करतात स्व:ता दखल देण्याचा अधिकार नसतो.
अदखलपात्र प्रकरणाचा तपास कोणताही पोलिस अधिकारी त्या खटल्याची संपरीक्षा करण्याचा व तो खटला संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय करणार नाही. न्यायालयाकडून तपासाचा आदेश मिळालेला पोलिस अधिकारी हा पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी दखलपात्र प्रकरणात वापरू शकत असलेले अधिकार वापरू शकतो.

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.






Share:

आर,गुंठा,एकर,हेक्टर,बिघा,म्हणजे कीती?

आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.



शेतकर्‍यांचा संबंध येणारा सर्वात महत्वपूर्ण कागद म्हणजे ७/१२ उतारा,तो उतारा वाचत असताना आपण काही शब्द बघतो ते म्हणजे आर,गुंठा, त्याच बरोबर इतरही शब्द तुमच्या कधी न‌ कधी कानावर पडले असतील जसे की एकर,हेक्टर,बिघा  हे शब्द वाचतान तुम्हालाही कधी-कधी प्रश्न पडत असेल नेमक हे शब्द आहेत काय हे कसे तयार झाले . चला तर मग या लेखा मधुन आपण समजुन घेऊया,आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.आर,गुंठा,एकर,हेक्टर,बीघा म्हणजे काय ?






खरं तर हे आर, गुंठा, एकर, हेक्टर, बिघा हे जमीन मोजण्याची एकके आहेत.

आर म्हणजे काय -:


आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. यामध्ये काय करतात तर जमीनीच मोजमाप मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.

गुंठा म्हणजे काय -:



पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत होती  त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.

गुंठा : १ गुंठा जमीन = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
 

एकर म्हणजे काय -:


एकर हे जमिन मोजण्याचे आपल्याकडील प्रसिद्ध एकक आहे.

 १ एकर = ४०४६.८७२६ चौरस मीटर.

 १ एकर = ४० गुंठे. 

 म्हणजेच  १ एकर जमीन = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर ( साधारणत: चाळीस गुंठे म्हणजे एक एकर)


अशा प्रकारे एक एकर तयार होतो.


हेक्टर म्हणजे काय-:



आपल्याकडे जमीन किंवा शेत जमीन ही हेक्टर मध्ये मोजली जाते. ४० गुंठ्यांचा मिळून १ एकर बनतो. १ गुंठा ३३ बाय ३३ फुटांचा असतो. एक हेक्टर म्हणजे किती एकर याचं उत्तर २.४७ एकर होय. याचाच अर्थ की ९८.८ गुंठा जमीन म्हणजे १ हेक्टर होय. १०००० चौरस मीटर चा एक हेक्टर होतो.

थोडक्यात हेक्टर (हे.) = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर (अडीच एकर म्हणजे एक हेक्टर) शंभर गुंठे किंवा शंभर आर म्हणजे एक हेक्टर (आर - हा शब्द 7/12 वर वापरला जातो)


बिघा म्हणजे काय -:


बघा हा शब्द भारतीय बोलीभाषेत आहे.पण प्रत्येक प्रदेशातील ठिकाणानुसार त्याचं परिमाण बदलतं

👉 बिहार मध्ये एक बीघा म्हणजे 2529.2 वर्ग मीटर

 👉राजस्थान मध्ये 2500 वर्ग मीटर

 👉बंगाल मध्ये. 1333.33 वर्ग मीटर

 👉आसाममध्ये 14,400 चौरस फूट (1337.8 चौरस मीटर).

 👉महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा (आर), एकर, हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत.

थोडक्यात काय तर -:
 
1 हेक्टर = 10000 चौ. मी. 1 एकर = 40 गुंठे.

1 गुंठा = [33 फुट x 33 फुट ] =

1089 चौ फुट.

1 हेक्टर = 2.47 एकर = 2.47 x 40 =

98.8 गुंठे.

1 आर = 1 गुंठा.

1 हेक्टर = 100 आर.

1 एकर = 40 गुंठे x [33 x 33] =

43560 चौ फुट.

1 चौ. मी . = 10.76 चौ फुट .

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.




Share:

‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय?

 ‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय व कसे बनवावे ?‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्डचे फायदे ,‌‌‌‌‌ मनरेगा जाँब कार्डसाठी कागदपत्रे व प्रोसेस काय असते . 





जाँब कार्डची गरज काय-:

जॉब कार्ड जॉब कार्ड ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जारी केले जाते. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत बनवलेले एक कार्ड आहे.ज्याद्वारे ते प्रत्येक वर्षात कोणतेही अकुशल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायद्यानुसार 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा मागण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.या जॉब कार्डने लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी दीली आहे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील या कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉब कार्डमध्ये नोंदवली जाते. यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जॉब कार्ड दिले जातात.

जाँब कार्डमध्ये काय असते-:

या कार्डमध्ये खालील माहिती असते

👉 जाँब कार्ड क्रमांक.

👉उमेदवाराचे नाव. 

👉वडील किंवा पतीचे नाव. 

👉पंचायत व जिल्ह्याचे नाव.

👉ग्रामसभेचे नाव.

👉वय.

👉लींग.


जाँब कार्ड कसे बनवावे -:

जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जावे लागेल. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा. त्याला भरून ते सांगतील ते आवश्यक कागदपत्रे जोडुन त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापरुन तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

मनरेगा जाँब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-:

 👉उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र.

👉 अर्जाचा नमुना.

 👉पासपोर्ट आकाराचे फोटो.

 👉पत्त्याचा पुरावा.

 👉रेशन कार्ड.

 👉आधार कार्ड.

👉पासबुक.

 👉मोबाईल नंबर.

जॉब कार्डवर ऑनलाइन नाव कसे पहावे-:

सर्वप्रथम जॉब कार्डच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in  वर जा. येथे दिलेल्या लिंकद्वारे थेट वेबसाइटवर जाण्यास येथे क्लिक करा.

                        👇

जॉब कार्ड वेबसाइट उघडल्यानंतर, ग्रामपंचायत अंतर्गत अहवाल तयार करा – जॉब कार्ड पर्याय निवडा.

                           👇

आता सर्व राज्यांची यादी उघडेल. त्यात तुमच्या राज्याचे नाव शोधा आणि ते निवडा.

                            👇

यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. यामध्ये प्रथम आर्थिक वर्ष निवडा. यानंतर तुमच्या जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.

                             👇

आता जॉब कार्डशी संबंधित माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. जॉब कार्डमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी R1 बॉक्समधील JobCard/Employment Register पर्याय निवडा.

यानंतर, तुम्ही निवडलेल्या ग्रामपंचायतीची जॉबकार्ड यादी उघडेल. तुम्ही जॉब कार्डमध्ये तुमचे नाव येथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही आँनलाईन नआव व इतर तपशील संकेतस्थळावर पाहु शकत.


आणखी वाचा >> 1 रुपयांत काढा पिक विमा.


मनरेगा जाँब कार्डचे फायदे-:

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, लाभार्थ्याला 100 दिवसांचा रोजगार मिळतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नरेगा जॉब कार्ड दिले जाईल.

 👉या योजनेंतर्गत लोकांना त्यांच्याच क्षेत्रात काम मिळते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही.

👉या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजगार मिळु शकेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

 👉जॉब कार्डमध्ये अर्जदार आपले नाव आणि जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातही लाभ दिला जातो.

👉 जॉब कार्डद्वारे भारतातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

👉नरेगा जॉब कार्डमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 देशातील सर्व राज्यातील गरीब लोक जॉब कार्डचा लाभ घेऊ शकतात.

 👉नरेगा जॉब कार्डची सुविधा ऑनलाइन असल्याने अर्जदाराचा वेळही वाचतो.

👉जॉब कार्डमध्ये तुम्हाला मनरेगा योजनेद्वारे मिळणार्‍या कामाची सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.

👉अर्ज केल्याच्या १५ दिवसांत काम न मिळाल्यास नियमितपणे बेरोजगार भत्ता दिला जाईल.

 👉योजनेंतर्गत नोकरीसाठी केवळ प्रौढ सदस्य पात्र आहेत.

👉 प्रत्येक प्रकल्पात किमान एक तृतीयांश महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.

 👉कामाचे ठिकाण ५ कि.मीच्या असते बाहेर असल्यास, कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता दिला जातो.

 👉महिला आणि वृद्धांना त्यांच्या परिसरात काम करण्यास प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा >> जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना 


मनरेगा योजनेंतर्गत सर्व कामगारांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामगारांसाठी अधिकृत मोबाइल अप्लिकेशन सुरू केले आहे. ज्यातून तुम्ही घरबसल्या नरेगाशी संबंधित माहिती मिळवू शकता. अँप डाउनलोड करण्यासाठी 👇👇

                येथे क्लिक करा.





हे अँप डाउनलोड करून‌ तुम्ही सर्व माहिती मोबाइल मध्ये बघु शकता. 


ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

 आणखी वाचा >> भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग 1मध्ये  कशी आणायची 


आणखी वाचा >>  लंपी विषाणू मराठी माहिती.

Share:

लंपी विषाणू लागण,कारणे,प्रादुर्भाव,उगम,प्रसार मराठी माहिती.

काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात  प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती. 




 नुकताच कोरोना वायरस नंतर गुरांमध्ये लंपी या रोगान थैमान घातले होते. लंपी  हा त्वचाचा रोग आहे असुन यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो. हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा या रोगचे प्रमाण अधिक असते.

काय आहे लंपी विषाणू-:

👉 रोगाला कारणीभूत विषाणू -: Lumpy Skin Disease Virus (LSDV)

👉 विषाणूची प्रजाती (Genus) - Capripoxvirus

👉लंपी विषाणूचे कुल (Family) - Poxviridae ( देवी आणि मंकीपॉक्स विषाणू याच कुळातील आहेत.)

👉 हा Zoonotic विषाणू नाही. याचा अर्थ हा रोग मानवांमध्ये पसरू शकत नाही. हा एक संसर्गजन्य रोग आहे. डास, चावणाऱ्या माश्या आणि गोचिड यांसारख्या वाहकांद्वारे पसरतो. सहसा गायी आणि म्हशींसारख्या प्राण्यांना प्रभावित करतो.

👉हा रोग वाहकांच्या थेट संपर्काद्वारे किंवा दूषित चारा आणि पाण्याद्वारे पसरतो. तसेच कृत्रिम गर्भाधान (बीजारोपण) करताना प्राण्यांच्या वीर्याद्वारे पसरू शकतो.

👉 झालेल्या प्राण्याच्या 'Lymph Nodes' वर (लसिकांवर) परिणाम होतो, ज्यामुळे नोड्स वाढतात आणि त्वचेवर गुठळ्यांसारखे दिसतात. त्यामुळे या रोगास लम्पी असे नाव पडले.

लंपी विषाणूचा उगम व‌ भारतात प्रसार -:


👉हा रोग पहिल्यांदा झांबियामध्ये १९२९ मध्ये दिसून आला.

👉नंतर बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. 

👉 त्यानंतर पश्चिम आशिया, आग्नेय युरोप आणि मध्य आशिया आणि अलीकडेच २०१९ मध्ये दक्षिण आशिया आणि चीनमध्ये पसरला.

👉FAO नुसार हा रोग सध्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, पश्चिम आशियाचा काही भाग (इराक, सौदी अरेबिया, सीरियन अरब प्रजासत्ताक) आणि तुर्कीमध्ये प्रदेशनिष्ठ रोग आहे.

👉दक्षिण आशियामध्ये प्रथम जुलै २०१९ मध्ये बांग्लादेशात पसरला. 

👉 ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात पोहोचला. सुरुवातीची प्रकरणे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आली. भारतात अलीकडील प्रसार जास्त प्रसार सुरू झाला आहे.


लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव-:


👉हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो.

👉 विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा रोगबाधेचे प्रमाण अधिक असते .

👉 सर्व वयोगटातील (नर व मादी) जनावरात आढळतो. लहान वासरात तुलनेत प्रमाण अधिक असते.

👉 उष्ण व दमट हवामान रोगप्रसारास पोषक ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास , गोचीड, चिलटे  यांच्यामार्फत होतो.

👉 आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काहीवेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.

👉 त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते.

👉गाई गाबन असल्यास गर्भपात होऊ शकतो.

लंपी रोगाची लक्षणे-:

 👉जर एखाद्या प्राण्याला या लंपी विषाणूची लागण झाली तर सर्वप्रथम त्या ताप येऊ लागतो आणि ते जनावर सुस्त होऊ लागते.

 👉जर एखाद जनावर या विषाणूच्या पकडीत आली तर त्याच्या डोळ्यातून आणि नाकातून स्राव होतो आणि तोंडातून लाळ टपकू लागते.

 👉जेव्हा गाईला हा आजार होतो तेव्हा त्या गायीची दूध देण्याची क्षमता कमी होते.

👉 जेव्हा एखादी गाय या विषाणूच्या कचाट्यात येते तेव्हा त्या गायीच्या अंगावर फोड येऊ लागतात आणि त्या युक्तीमुळे त्या गायीला खूप त्रास होऊ लागतो.

 👉सतत ताप.

 👉वजन कमी होणे.

 👉लाळ येणे.

👉वाहणारे नाक आणि डोळे

👉दुधाची कमतरता जाणवणे.

 👉वेगवेगळ्या प्रकारचे फोड्या दिसणे.

 👉अंगावर पुरळ सारखे गुठळ्या.

लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय -:

👉जर एखाद्या जनावरात हा विषाणू आढळला तर त्याला बाकीच्या जनावरापासून वेगळ ठेवा जेणेकरून ती इतर प्राण्यांमध्ये पसरू नये.

 👉कारण हा रोग माश्या, डास आणि कुंड्यांमुळे देखील पसरतो, म्हणून आपल्या प्राण्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवा जेणेकरून या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला येऊ नयेत.

 👉ज्या वस्तूंमध्ये प्राणी अन्न खातात किंवा पाणी पितात त्या गोष्टी पूर्णपणे स्वच्छ ठेवाव्यात.

 👉तुमच्या जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉 जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.

👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.

 👉तुमच्या आजूबाजूला संसर्गग्रस्त भाग असल्यास त्या भागातून जनावरांची ये-जा थांबवा.

 👉संसर्ग झालेल्या प्राण्याभोवती जंतू मारणाऱ्या रसायनाची फवारणी करा.

 👉लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जनावराचा नमुना घेत असताना त्या वेळी तुम्हालाहि काळजी घ्यावी लागेल

लम्पी त्वचा रोगावर कोणतीही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते.म्हणुन होण्यापूर्वीच सावधान‌ राहणे गरजेच आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.







Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels